लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क).
मुंबई: राज्यात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू
असतानाच काही महिन्यांच्या अंतराने करोनाची तिसरी लाटही राज्यात धडकण्याची भीती
व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश
टोपे यांनीच माहिती दिली असून जुलै किंवा ऑगस्ट
महिन्यात राज्यात करोनाची तिसरी लाट येवू शकते. या
लाटेचा सामना करण्यासाठी आपण आतापासूनच सज्ज व्हायला हवे, अशा
सूचना खुद्द मुख्यमंत्री उद्वव
ठाकरे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत, असे टोपे
यांनी नमूद केले.
राज्यात करोनाची तिसरी लाट जुलै किंवा
ऑगस्टमध्ये येवू शकते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ही भीती लक्षात घेता ही लाट
येण्याआधी आपण आवश्यक पावले टाकायला हवीत. प्रामुख्याने ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध
असेल यासाठी नियोजन केले गेले पाहिजे. आपल्याकडे पुरेसा ऑक्सिजन नाही हे तिसऱ्या
लाटेत ऐकून घेतले जाणार नाही, असा इशाराच मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीत दिल्याचे राजेश टोपे यांनी
सांगितले. ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेवून आतापासूनच पावले टाकावीत. प्रत्येक
तालुक्यात ऑक्सिजनचा प्लांट उभारला गेला पाहिजे. आता जी धावपळ चालली आहे ती
तिसऱ्या लाटेत दिसता नये, अशी सूचनाही सर्व
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असे टोपे यांनी नमूद
केले.
0 टिप्पण्या