Ticker

6/Breaking/ticker-posts

..तर त्या शिक्षणाचा काय उपयोग : पंकजा मुंडे

 







लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

अंबाजोगाई : शिक्षणाने व्यक्ती घडते तर, संस्काराने समाज घडतो. मानवी जीवनात शिक्षणाबरोबरच संस्कारदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत, शिक्षण कितीही घेतले तरी संस्कार नसतील तर त्या शिक्षणाचा काहीही उपयोग नसतो, असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अंबाजोगाई येथे केले.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२१-२२ चे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर तर, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा प्रमुख उपेंद्र कुलकर्णी, आमदार नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे, डॉ. कल्पना चौसाळकर, चंद्रकांत मुळ्ये, आप्पाराव यादव आदी या वेळी उपस्थित होते.

मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथराव मुंडे आणि दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा या संस्थेशी ऋणानुबंध होता. तोच स्नेह आणि कौटुंबिक नाते भविष्यातही राहणार आहे. एका विचाराने आपण जोडले गेले आहोत. आजच्या पिढीला संस्कार देण्याचे मोलाचे कार्य या संस्थेतून होत आहे. महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यपालांना आमंत्रित करणार असल्याचेही मुंडे या वेळी म्हणाल्या.

तत्पूर्वी, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना सेंद्रिय खताचे वाटप करण्यात आले. खोलेश्वर महाविद्यालयाच्या सौरप्रकल्पासाठी आमदार मुंदडा यांच्या वतीने त्यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लक्ष रुपयांचा निधी देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. राम कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या