Ticker

6/Breaking/ticker-posts

खळबळ : अपहरण झालेले व्यापारी गौतम हिरण यांचा मृतदेह आढळला ; गुढ वाढले

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यातील  बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वाकडी शिवारात रुळाच्या बाजूला आढळून आला आहे. या घटनेनंतर सगळीकडेच खळबळ उडाली आहे. दरम्यान मारेकऱ्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले असून या गुन्ह्याचे गुढ अधिकच गन्द झाले आहे .

बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण याचे सोमवार दि.१ मार्च रोजी सायंकाळी अपहरण झाले होते. यानंतर बेलापूर ग्रामस्थांनी बेपत्ता व्यापारी हिरण यांचा पोलिस प्रशासनाने शोधण्याच्या मागणीसाठी बैठक घेऊन गाव बंद ठेवण्यात आले होते. व्यापारी गौतम हिरण यांची माहीती देणारास 1 लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी गाव बंद ठेवून सोमवार पासुन बेमुदत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 




दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात या प्रकरणी सरकारवर टिकेची झोड उठवून पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले  होते. त्यामुळे गौतम हिरण यांचा युध्द पातळीवर शोधा सुरु झाला होता, अखेर आज रविवार (दि. ७ मार्च) रोजी सकाळी गौतम हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत रेल्वे रुळाच्या बाजूला आढळून आला आहे .

अशी माहीती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती गावात पसरल्याने गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. गौतम हिरण यांचा मयत होऊन  चार ते पाच दिवस झाले असल्यानेच प्रेताची दुर्गंधी सुटली असावी, या घटनेतील मारेकरांचा पोलिसांनी तातडीने तपास लावावा, अशी मागणी बेलापूर ग्रामस्थांनी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या