Ticker

6/Breaking/ticker-posts

वीज कनेक्शन तोडले जाणार नाही - उपमुख्यमंत्री

 






लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

मुंबई : लॉकडाउनच्या काळात ग्राहकांना भरमसाठ वीज बिल आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका बसला होता. पण वीज बिल न भरल्यामुळे कनेक्शन तोडण्याची मोहिमच महावितरणने या आठवडयापासून सुरू केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप आणि काँग्रेसने वीज कनेक्शन तोडल्याप्रकरणी एकसारखीच भूमिका मांडल्यामुळे अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आहे. वीज कनेक्शन तोडले जाणार नसल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुद्धा वादळी झाली. आज प्रश्न उत्तराच्या तासात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज कनेक्शन तोडणीच्या मुद्दा उपस्थितीत केला. लॉकडाउनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल आहे. एकाच वेळी एवढी मोठी रक्कम भरणे सर्वसामान्यांना शक्य नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते पण नंतर त्यांनी माघार घेतली. या मुद्दावर चर्चा झाली पाहिजे किंवा तात्काळ वीज कनेक्शन तोडण्याचे काम थांबवले पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही वीज बिलाच्या मुद्यावर चर्चा करण्याचे मत व्यक्त केले. तसेच

जे काही वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरू आहे ते थांबवले पाहिजे, अशी मागणी केली. त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन तोडण्याची जी काही प्रक्रिया सुरू आहे, ती थांबवण्यात येणार आहे. जोपर्यंत वीज बिलाच्या मुद्यावर सभागृहात चर्चा होणार आहे. ऊर्जा विभागाकडून याची सविस्तर माहिती दिली जाईल, अशी घोषणाही करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या