Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने?सरकार अॅक्शन मोडमध्ये ..




उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री टोपेंनी दिला इशारा...

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

* महत्वाचे*

*महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय होऊ शकतो.

 *अजित पवार आणि राजेश टोपे यांनी दिले संकेत.

*दोन आठवड्यात २० हजार रुग्ण वाढले .

औरंगाबाद: -_राज्यात पुंन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या दोन आठवड्यांत नवीन बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्यामुळे उप मुख्यमंत्री अजितदादा  पवार व आरोग्य मंत्रा राजेश टोपे यांनी येत्या काळात कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता बोलून दाखवली आहे. त्यामुळे राज्यावर पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकट घोंगावू लागले आहे._


_अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार विभागवार आढावा बैठका घेत आहेत. आज औरंगाबाद येथे त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे हेसुद्धा उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दोन्ही मंत्र्यांनी राज्यातील कोरोना स्थितीवरही भाष्य केले व एकप्रकारे धोक्याचा इशाराच दिला.


 राज्यात गेले काही दिवस नवीन बाधितांची संख्या वाढत आहे. रविवारी राज्यात ४ हजारावर नवीन बाधितांची भर पडली आहे. विशेषत: ग्रामीण भागात कोरोना रुग्णवाढ दिसून येत आहे. त्यावर बोट ठेवत अजित पवार आणि राजेश टोपे या दोघांनीही कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले.


_राज्यात मागील दोन आठवड्यांत २० हजार २११ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची ही वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे गरज भासल्यास पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.


 सध्या कुणीच मास्क वापरत नाही, असे दिसून येत आहे. ही बाब अत्यंत घातक आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असा इशाराच अजित पवार यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी उद्या भेटणार आहे. या बैठकीत कोरोनासंदर्भात कदाचित कठोर निर्णय घेतले जातील, असेही अजित पवारांनी नमूद केले. कोरोनामुळे शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन आम्ही केले आहे, तरीही काही लोक यात नाहक राजकारण करत असल्याची टीका अजित पवार यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांसाठीही नियमावली लागू केली पाहिजे. याबाबत नक्कीच मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही अजितदादा म्हणाले._


राजेश टोपे यांनी तर यावेळी थेट लॉकडाऊनचेच संकेत दिले. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक आहे, अन्यथा लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय उरेल आणि लोकहितासाठी तो कठोर निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी ठामपणे सांगितले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या