Ticker

6/Breaking/ticker-posts

ओबीसी मोर्चा : जालन्यात उत्स्फुर्त प्रतिसाद

 

जनगणना करुन समाजाच्या लोकसंख्येनुसार

 हक्क मिळावे  ना.वडेट्टीवार

     नगर - ओबीसीची जनगणना करुन समाजाच्या लोकसंख्येनुसार हक्क मिळावे. 51 टक्के हा समाज असूनआजपर्यंत समाजाला हक्क प्राप्त नाहीअशी खंत राज्याचे बहुजन विकासमदत  पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलीजालना शहरात ओबीसी समाजाच्या भव्य मोर्चा आयोजित केला होतातत्पूर्वी ना.वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते.

    
मराठा
 समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाहीअसे स्पष्ट करुन मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण  देता स्वतंत्र आरक्षण द्यावेअसे त्यांनी एका प्रश्नांला उत्तर देतांना सांगितलेओबीसी  समाज वर्षानुवर्षे वंचित असल्याने आज समाज जागृत झाला आहेओबीसी,व्हीजेएन.टीअसे संयुक्त  संघटन यानिमित्ताने राज्यात सुरु झाले आहेया समाजाला न्याय हक्क प्राप्त करुन देणे यासाठी हा मोर्चा जालना आयोजित केला आहेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

     यावेळी राज्य संघटनेचे  अध्यक्ष बाळासाहेब सानपलक्ष्मण हाकेसोमनाथ काशिदसंघटनेचे नगर  शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळफिरोज शफी खानअभिजित कांबळेराजेश सटाणकर आदि  उपस्थित होतेपत्रकार परिषदेनंतर नगरच्या शिष्टमंडळाने ना.वडेट्टीवार यांची भेट घेऊन नगरच्या ओबीसी मेळाव्यानंतर संघटनेच्या कामाचा अहवाल दिलाशहरातील नवीन संघटन आणि वाटचाल यावर मंत्री  महोदयांनी समाधान व्यक्त केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या