Ticker

6/Breaking/ticker-posts

आता, परिवर्तन करूनच दाखवू : केदारेश्वराचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

टाकळीमानुर ( विक्रम केदार )

 -सहकारी संस्थांमध्ये राजकारण करायचं नाही, ही शिकवण जेष्ठ नेते बबनराव ढाकणे यांनी आम्हाला घालून दिलेली आहे. मात्र मागील महिन्यात केदारेश्वर कारखान्याचा जिल्हा बँकेला दिलेला १७ कोटी रुपयांचा प्रस्ताव या तालुक्यातील संचालकांनी विरोध केल्यामुळे फेटाळला गेला. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. ढाकणे यांनी राजकारणात कधीही कुणाशी वैयक्तिक शत्रुत्व धरलेलं नाही. मात्र मी आज सांगतो, या दोन तालुक्यांमध्ये खऱ्या अर्थाने सर्वतोपरी परिवर्तनाची लढाई आता सुरू केलेली आहे. ती यशस्वी करून दाखवू असा  गर्भित इशारा केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे यांनी दिला.


      पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर येथे संघर्षयोधाद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखानाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऋषिकेश ढाकणे यांचा सत्कार  करण्यात आला. यावेळी समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब ढाकणे होते.


     यावेळी माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ, नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक मनीषा खेडकर ,अर्जुन शिरसाठ ,भीमसेन खेडकर , मुसा शेख, मच्छिंद्र मानकर ,संदीप शिंदे , कानिफ आंधळे, राहुल खेडकर , महादेव जायभाय , पिराजी शिरसाठ, लक्ष्मण ठोंबरे , सतीश मुनोत आदी मान्यवर उपस्थित होते.

  ढाकणे पुढे म्हणाले,अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून केदारेश्वरने आजपर्यंतची वाटचाल केली आहे . जिल्ह्यातील काही दोन-तीन कारखान्यांचा अपवाद वगळला तर त्याच तुलनेत केदारेश्वरला आज कुणाचेही देणे नाहीत. सुरुवातीपासून जिल्हा बँकेने या संस्थेला पैसे देण्यास नकार दिला. अगदी आजही तीच परिस्थिती आहे. जानिवपूर्वक दूजाभाव केला जातोय. हाच त्यांचा सहकार आहे काय ? मात्र तरीही प्रतापराव ढाकणे यांनी स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून या संस्था व सभासद , ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कशाचीही तमा   बाळगली नाही. 


एकेकाळी ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांनी वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला होता, सभासदांचे जीवावर मात्र सहकारी संस्थांमध्ये राजकारण आणायचे नाही, ते आणले तर सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांचे नुकसान होते. म्हणून  उदार मनाने ती संस्था पुन्हा ज्यांच्या ताब्यात होती ,त्यांच्याकडे सुपूर्द केली , ही शिकवण आम्हाला त्यांची आहे म्हणून आजही आम्ही इतर सहकारी संस्थांच्या कारभारात ढवळाढवळ केलेली नाही , मात्र तुमचे जर धोरण बदलत नसेल तर आता आम्हालाही बदल करावा लागेल त्यासाठी परिवर्तनाची लढाई या तालुक्यापासून सुरू करायची आहे .ती सर्वार्थाने यशस्वी करून दाखवणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.







यावेळी ढाकणे यांच्या हस्ते दर्ग्यावर चादर अर्पण करण्यात आली

पुढे बोलताना ढाकणे म्हणाले की, सुमारे २५ ते ३० वर्षे प्रताप काकांचा राजकीय संघर्ष  सुरू आहे . १९६७  साली बबनराव ढाकणे साहेबांना टाकळीमानुर गटाने दिल्लीत पाठवले, त्याची पुनरावृत्ती  येत्या २०२४ मध्ये करायची आहे. त्याची सुरवात टाकळी मानूर पासून करून प्रताप काकांचा राजकीय वनवास संपून  टाकायचा आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी, सर्वांना बरोबर घेऊन पुढील एक वर्ष आपण अतिशय जोमाने काम करायचे आहे, असे ढाकणे यांनी आवाहन केले.


 यावेळी माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट, अजित शिरसाट, सतीश मुनोत बाबासाहेब ढाकणे, नानासाहेब ढाकणे  आदींची भाषणे झाली .प्रास्ताविक राजेंद्र नागरे यांनी केले . सूत्रसंचालन शिरसाट पी यु यांनी केले .उपस्थितांचे आभार भीमराव फुंदे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या