Ticker

6/Breaking/ticker-posts

अखेर..कोल्हार-उदरमल या धोकादायक घाट रत्याचे काम सुरु ..!

 

जय हिंद फौंडेशन व ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश

मंगळवारचे रास्तारोको आंदोलन स्थगित -शिवाजी पालवे




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

 नगर (प्रतिनिधी)- कोल्हार-उदरमल घाटातील जीवघेणा व धोकादायक बनलेल्या रस्ता दुरुस्तीचे काम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रविवारी (दि.९ जुलै) हाती घेण्यात आले. सदर रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने मागील एक वर्षापासून पाठपुरावा सुरु होता. मात्र रस्ता होत नसल्याने फाऊंडेशनच्या वतीने स्थानिक ग्रामस्थांसह मंगळवारी (दि ११ जुलै) रास्तारोकोचा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेऊन या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे.


या रस्त्याच्या कामाची पहाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, जय हिंदचे अध्यक्ष शिवाजी पालवे, उप अभियंता किशोर डोंगरे, कनिष्ठ अभियंता वसंत फड यांनी केली.

पाथर्डी तालुक्यातील कोल्हार व नगर तालुक्यातील उदरमल या ठिकाणी असलेला कोल्हार-उदरमल घाटातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. खड्डेमय रस्त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत होते. यामध्ये अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे, तर काहींचा जीव देखील अपघातामध्ये गेला आहे. या घाटातील रस्ता खराब असल्याने कोल्हार, उदरमल, चिचोंडी शिराळ, डोंगरवाडी, धारवाडी, गितेवाडी, डमाळवाडी येथील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या घाटातून सर्वसामान्य शेतकरी, नोकरदार वर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात रहदारी करतात. अनेक लहान मोठ्या गावांना जोडणारा हा घाट असल्याने ग्रामस्थांच्या सोयीसाठी मागील एक वर्षापासून जय हिंद फाऊंडेशन रस्ता दुरुस्तीसाठी आग्रही होते. 


जिल्ह्यात मान्सून सक्रीय होण्यापूर्वी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने खचलेला रस्ता, खड्डे व साईड पट्टयाचे काम हाती घेतल्याने ग्रामस्थांच्या माध्यमातून मंगळवारी पुकारलेला रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती शिवाजी पालवे यांनी दिली. तर रस्त्याची चांगल्या पध्दतीने दुरुस्ती करण्याच्या सूचना अंकुश पालवे यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या. रस्ता कामाला सुरुवात झाल्याने मंगळवार दि. ११  रोजीचे नियोजित रास्तारोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे जय हिंद चे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी सांगितले.


या घाटातील रस्ता दुरुस्तीसाठी माजी पंचायत समिती सदस्य एकनाथराव आटकर, पाथर्डी बाजार समितीचे संचालक वैभव खलाटे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष अंबादास डमाळे, बाळासाहेब पालवे, कोल्हारचे सरपंच राजू नेटके, उपसरपंच गोरक्ष पालवे, महादेव पालवे गुरुजी, सोपानराव पालवे, शंकरराव डमाळे, नामदेव जावळे, जांबुवंत पालवे, अशोक गर्जे, ग्रामपंचायत सदस्य किशोर पालवे, ईश्‍वर पालवे, शर्मा पालवे, संदीप पालवे, गौरव गर्जे, सोपान पालवे, प्रेमकुमार पालवे, मा सरपंच बाबाजी पालवे, मदनशेठ पालवे, विजय पालवे, जय हिंदचे शिवाजी गर्जे, अ‍ॅड. पोपट पालवे, अ‍ॅड. संदीप जावळे, रोहीदास पालवे, उदरमलचे सरपंच केशव भिंगारदिवे, वैभव पालवे, अशोक आव्हाड, नवनाथ पालवे, सचिन पालवे, बंडू पालवे, चेअरमन बाबाजी आव्हाड, शिराळचे सरपंच रविंद्र मुळे, अमोल घोरपडे, उपसरपंच उमाताई आव्हाड, मिठ्ठू मुळे, अवधूत दारकुंडे, अमोल वाघ, गितेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पोटे, उपसरपंच राजेंद्र गिते, महादेव गिते, रामेश्‍वर गिते, वैभव गिते, डोंगरवाडीचे सरपंच उद्धव गिते, दिलीप गिते, विठ्ठल नाना गिते, माणिकराव गिते, डमाळवाडी सरपंच रामनाथ शिरसाठ, आंबादास शिरसाठ, महादेव शिरसाठ, करण डमाळे, आनंदराव शिरसाठ, उपसरपंच दगडू डमाळे, भानुदास डमाळे, चिचोंडीचे सरपंच कलाबाई आटकर, श्रीकांत आटकर, प्रमोद जराड, आबा गरुड, बबनराव गायकवाड, संजय शिंदे, चेअरमन पोपट आव्हाड, आश्रुबा आव्हाड, विष्णु गंडाळ, संदीप दानवे, युवा नेते संतोष गरुड, धारवाडीचे सरपंच बापू गोरे, उपसरपंच चंद्रकांत बडे, भिमराज सोनवणे, नवनाथ रणसिंग, चरणदास आव्हाड, भाऊसाहेब गोरे, कैलास गिते, रमेश गिते आदी प्रयत्नशील होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या