Ticker

6/Breaking/ticker-posts

मग मी काय करू ? तुरुंगात जाऊ ? ; अजितदादा भडकले !

 





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पुणे: ईडीच्या धाडी, अटका आणि आरोप-प्रत्यारोपांमुळं राज्यातील राजकारण सध्या गाजत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना प्रत्येक ठिकाणी याच संदर्भातील प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. पुण्यातील विकासकामांचा आढावा घेत असताना उपमुख्यमंत्री  अजित पवार यांना अशाच एका आरोपाबद्दल विचारलं असता ते संतापले आणि 'तुरुंगात जाऊ का?' असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. 

भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या हे महाविकास आघाडीतील नेते व मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सातत्यानं करत आहेत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील इतर नेत्यांवरही हल्ला केला होता. ठाकरे सरकारमधील 'डर्टी डझन'ची यादी आपल्याकडं तयार आहे. त्यात अजित पवार यांचंही नाव आहे. अजित पवार लवकरच तुरुंगात जातील असं सोमय्या यांनी म्हटलं होतं. 

सोमय्या यांच्या या वक्तव्याकडं अजित पवार यांचं लक्ष वेधलं असता ते भडकले. ' मग काय करू, तुरुंगात जाऊ का? असा प्रश्न त्यांनी केला. ' मला यावर काहीही बोलायचं नाही. नो कमेन्ट्स! मी विकासकामाला महत्त्व देतो. कायद्यानं, नियमानं जे काही व्हायचं असेल ते प्रत्येकाच्या बाबतीत घडेल, असं ते म्हणाले. पत्रकारांनाही विकासकामांपेक्षा याच गोष्टीत जास्त रस असल्याचा त्रागा त्यांनी व्यक्त केला. त्यावर लोकांना हेच आवडतं असं एका पत्रकारानं सांगितलं. त्यावरही अजित पवार यांनी उत्तर दिलं. ' फार कमी लोकांना अशा गोष्टींमध्ये रस असतो. लोकांना विकास हवा असतो. ते पाहूनच लोक संधी देतात. ज्यावेळी नरेंद्र मोदी साहेब इथं आले, तेव्हा त्यांनीही विकासाच्या मुद्द्यावर लोकांचं मन जिंकलं होतं. ही फॅक्ट आहे, असं ते म्हणाले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या