Ticker

6/Breaking/ticker-posts

बाजार समितीच्या प्रश्नांसाठी आढावा बैठक उपयुक्त : उपनिबंधक आहेर

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर : नगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती करोना काळात संकटात सापडल्या आहेत. सर्व बाजार समितींना अडचणीतून व संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रथमच सर्व बाजार समितींच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. बाजार समितींचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आढावा बैठक उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी केले.

 जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने जिल्हा बँकेच्या सभागृहात काल दुपारी जिल्ह्यातील सर्व बाजार समितींच्या सभापती व सचिवांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिक विभागीय पणम महामंडळाचे उपव्यवस्थापक चंद्रशेखर बारी, राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, पारनेर बाजार समितीचे सभापती व जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, प्रशासक डी.ए.घोडेचोर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध बाजार समितींचे सभापती व सचिवांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती. या बैठकीत बाजार समितींच्या अनेक प्रश्नांची उहापोह झाली. बाजार समितींचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल उपनिबंधक दिग्विजय आहेर यांचा प्रशांत गायकवाड यांनी सन्मान केला.

चंद्रशेखर बारी म्हणाले, जिल्ह्यतील बाजार समितींच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेवून प्रश्न समजावून घेतली आहेत. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या व महाराष्ट्र राज्य कृषी पणम महामंडळाच्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना बाजार समितीच्या मार्फत राबवल्या जातात त्यांच्या प्रभावी अमलबजावणी साठी सूचना केल्या आहेत. या आढावा बैठकीतून बाजार समितींचे प्रश्न मार्गी लागणार असल्याने पुढील काळात सर्व बाजार समिती चांगले काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 सभापती प्रशांत गायकवाड म्हणाले, बाजार समितींचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रथमच आढावा बैठक उपनिबंधक कार्यालयाने घेतल्याबद्दल त्यांचे आभार. करोना काळात सर्व बाजार समितींच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाचा विचार न करता शेतकऱ्यांचे मालाचा लिलाव केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सर्व बाजार समितींच्या सर्व कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन करोना वॉरियर म्हणून घोषित करावे, अशी मागणी करून सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या