Ticker

6/Breaking/ticker-posts

दिलासादायक: राज्यात करोनाचा ग्राफ येतोय खाली; मुंबई, पुण्यातून उतरती

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: देशात करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असतानाच महाराष्ट्रातील स्थिती मात्र नियंत्रणात येत आहे. राज्यात आजही नवीन बाधितांच्या तुलनेत करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली. मृतांचा आकडाही सातत्याने कमी होताना दिसत आहे. राज्यात रिकव्हरी रेट आता ९७.२ टक्के इतका झाला असून ही दिलासा देणारी बाब आहे.

 राज्यात सध्यातरी करोनाच्या तिसऱ्या लाटेची कोणतीही शक्यता दिसत नसल्याचे विधान कालच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते. त्यासोबतच सणासुदीच्या काळात थोडीफार गर्दी झाली तरी लसीकरणाचा वेग वाढवल्यास संसर्गाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात रोखणे शक्य होईल, असे टोपे म्हणाले होते. त्यानंतर आजच्या आकडेवारीतून काहीसे दिलासा देणारे चित्र समोर आले आहे. आज चार हजारावर रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४० हजारांपर्यंत खाली आली आहे. राज्यात करोना मृत्यूचे प्रमाणही कमी होताना दिसत आहे. आज एकूण ७० रुग्ण दगावले असून त्यात सर्वाधिक २१ मृत्यू अहमदनगर जिल्ह्यात झाले आहेत. मुम्बई पालिका क्षेत्र आणि पुणे महापालिका क्षेत्रात आज प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील दोन्ही प्रमुख शहरांसाठी ही महत्त्वाची बाब ठरली आहे.


करोनाची राज्यातील आजची स्थिती...

* राज्यात आज ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
* सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.१२ % एवढा आहे.
*काल राज्यात ३ हजार १३१ नवीन रुग्णांचे निदान.

 *गेल्या २४ तासांत ४ हजार २१ रुग्ण बरे होऊन घरी.

* राज्यात आजपर्यंत एकूण ६३,४४,७४४ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
* राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९७.२ % एवढा.
* आजपर्यंत ५,७३,०७,८२५ प्रयोगशाळा चाचण्या पूर्ण.
* एकूण नमुन्यांपैकी ६५,२७,६२९ ( ११.३९टक्के ) नमुने पॉझिटिव्ह.
* सध्या राज्यात २,७२,०९८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये.
*संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये फक्त १ हजार ७०४ व्यक्ती.
*राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४० हजार ७१२ इतकी

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या