Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्रान गाठलं नवं शिखर; महाराष्ट्रात पाच कोटी लसवंत !


 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: करोना प्रतीबंधक लसीकरण मोहिमेत सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यात या मोहिमेत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली आहे. देशभरात उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.

राज्यात १४ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. सोमवारी झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या कामगिरीसाठी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत सोमवारी ६ लाख ८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यासोबतच राज्यात एकूण डोसेसच्या संख्येने ५ कोटींचा टप्पा पार केला असून उत्तर प्रदेश पाठोपाठ देशात महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेचे विशेष कौतुक आहे, असे राजेश टोपे यांनी नमूद केले.

दरम्यानकोविड लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेली आहे. लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यांत राज्याचा सातत्याने पहिला क्रमांक राहिला आहे. पुरेसा लसपुरवठा न झाल्याने अनेकदा मुम्बई पुण्यासारख्या महानगरांत लसीकरण थांबवावे लागले आहे. या स्थितीतही राज्याने पाच कोटी नागरिकांना आतापर्यंत लस देऊन लसीकरणाचा मोठा टप्पा गाठला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या