Ticker

6/Breaking/ticker-posts

तालुक्याचे वाळवंट झाले ;बाराशे कोटींचा निधी गेला कुठे-अँड प्रताप ढाकणे

अॅड.प्रताप ढाकणे यांची आमदार राजळे यांच्यावर नामोल्लेख टाळत  घणाघाती टीका 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 टाकळी मानूर : लोकांनी तुम्हाला दुसऱ्यांदा संधी दिली,तुम्ही म्हणता बाराशे कोटी रुपये विकास निधी आणला त्याचा हिशोब काय, तुमचे सल्लागार चुकीचे त्यामुळे तालुक्याचे अतोनात नुकसान झाले आहे. तुमच्या विविध संस्थांमधील कारभारी कोण अन कारभार कोण पाहतोय, टक्केवारी साठी तुम्हाला असे सल्लागार लागतात का असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अॅड.प्रताप ढाकणे यांनी करत आमदार मोनिका राजळे यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर घणाघाती टीका केली.

कोरोना योद्धा पुरस्कार वितरण कार्यक्रमादरम्यान  ते बोलत होते.अॅड.ढाकणे यांनी आमदार राजळे व त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी कार्यकर्त्यांची  नावे न घेता केलेली टीका व पालिकेतील टक्केवारीच्या व्यवहारावर पुराव्यासह टाकलेला प्रकाश तालुक्यातील आगामी काळातील पेटते राजकीय वातावरण सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. यावेळी नगरसेवक बंडू बोरूडे,योगेश रासने,वैभव दहिफळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.पुरस्कार वितरण सोहळ्यास डॉ.दिपक देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,सिताराम बोरुडे,विनय बोरुडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना अॅड.ढाकणे म्हणाले यापूर्वीच्या नेत्यांनी तालुक्याचे वैभव वाढवले. प्रामुख्याने बबनराव ढाकणे व स्व.बाबूजी आव्हाड, ,स्व.गणपतराव म्हस्के,स्व.माधवराव नि-हाळी, माजी आमदार आप्पासाहेब राजळे, स्व.वसंतराव नाईक,स्व.बाळासाहेब भारदे, स्व.राजीव राजळे यांच्यासारख्या अनेकांचे योगदान लाभले.आज तालुक्याची काय अवस्था आहे.तुम्ही घोषित केलेल्या विकास निधीने तालुक्याचे नंदनवन व्हायला हवे होते.कोविड साठीच्या आमदार निधीचे एक कोटी कुठे गेले. तुम्ही लोकांची व तालुक्याची फसवणूक करून टक्केवारी साठी गुंड,ठेकेदार पोसत आहात.तुमची पंचायत समिती कोण चालवतो,तालुका संघाची काय अवस्था आहे. ज्याने आयुष्यभर चोऱ्यामाऱ्या,दादागिरी करत गरिबांच्या माना पिरगळल्या त्यांचे एकूण पंचायत समितीच्या अभियंत्याच्या अन्नात माती कालवली.अधिकारी हुजरेगिरी करत नाहीत,टक्के वारीचे ऐकत नाहीत म्हणून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना बळी देणाऱ्या सल्लागारांना तपासा.ढाकणेंना संस्था सांभाळता येत नाहीत अशी टीका करताना आत्मपरीक्षण करा.तुम्हाला सर्व आयते व सुखात भेटले आहे.जिल्हा बँक तुमच्या काखेत आहे.रात्री बारा वाजता पैसे काढता,परस्पर साखर विक्री करता, एवढे वर्ष झाले कारखाना कसा कर्जमुक्त होत नाही.पालिकेच्या परवानग्या न घेता तुम्ही बाजार समितीत गाळे बांधले आता नोटिसा आम्हाला पाठवता.तुमची पापे धूवून आम्हाला राजकारणाचा वीट आला आहे.

नगरपालिकेचा असा अंदाधुंद कारभार तर राज्यात शोधून सापडणार नाही. तुमचे कारभारी काय करतात याची तुम्हाला खरोखर माहिती नाही हे लोकांना पटत नाही. स्वच्छतेचा ठेका एवढा महाग देऊन यंत्रणा तर पालिकेची वापरली जाते. गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मुंडे यांच्या नावाने जॉगिंग पार्कचा फार्स टिकणार नाही. ओढ्यावर पार्क उभारून न झालेल्या कामाचे बिल कसे निघाले. मुंडेंचे नाव वापरून लोकांना मतासाठी भावनिक करायचे,पैसे काढून घ्यायचे. शहरात स्वच्छतागृहे व पार्किंगची व्यवस्था नाही. जुन्या पालिकेत पत्त्यांचा अड्डा चालतो. लाखो रुपये खर्च करून अवघ्या काही महिन्यापूर्वी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे. ज्या गावात राहायचे,ज्या गावाने मोठेपण दिले त्यांची फसवणूक करणे योग्य नाही. अशी टीका ढाकणे यांनी केली. तर आजूबाजूचे आमदार बघा,त्यांचे काम बघा आणि तुम्हाला तपासून बघा. आमचा मित्र सुद्धा (स्व.राजीव राजळे) असा वागला नाही. अपात्र सल्लागारांच्या गराड्यातून बाहेर पडून विकासाचे मुद्दे शोधा. असे अॅड.ढाकणे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या