Ticker

6/Breaking/ticker-posts

जनता कुंभकर्णासारखी झोपलीय, मी एकटा काय करू ? अण्णा हतबल..

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पारनेर: आता कोठे गेले अण्णा, झोपले की काय? असा सवाल अधूनमधून सोशल मीडियातून केला जातो. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  यांनी आंदोलन करावे, अशी अपेक्षा ठेवून हा प्रश्न केला जातो. तर अनेकदा त्यामागे राजकीय टीकाही असते. अशा परिस्थितीत आता हजारे यांनीही जनतेवरच झोपल्याचा आरोप केला आहे. जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे, त्यामुळे सरकार त्यांना हवे ते करून घेत आहे. जनता जागी झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत,’ असं हजारे यांनी म्हटलं आहे. आपण मात्र जागेच असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितलं.

देश बचाव जनआंदोलन समितीनं गेल्या आठवड्यात पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या विविध प्रश्नांवर हजारे यांनी भूमिका मांडावी, आंदोलनासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती. अन्यथा राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळं हजारे यांच्याकडून समितीला चर्चेला येण्याची निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानुसार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करताना हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

हजारे म्हणाले, ‘माझं वय आता ८४ वर्षे आहे. मी कधीपर्यंत लढूदेश बचाव जनआंदोलन समिती युवकांनी स्थापन केली. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही लढा उभा करामी तुमच्यासोबत अवश्य येईल. आतापर्यंत आपण आंदोलनं करून लोकहिताचे कायदे मंजूर करून घेतले. मात्रआता सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात येत आहेत. मागणी नसताना अनेक कायदे करण्यात येत आहेत. जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे. त्यामुळं सरकारलाही हे करणं शक्य होत आहे. जनतेनं आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली पाहिजेतेव्हाच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द केले जातील,’ असंही हजारे म्हणाले. यावर कार्यकर्त्यांनी हजारे यांना पूर्वीच्या आंदोलनांची आठवण करून दिली. ‘ तुमच्या शब्दाला दिल्लीत वजन आहे. तुम्ही दिल्लीला हलवू शकतात्यामुळं आम्ही तुमच्याकडं आलो आहोत,’ असं कार्यकर्ते हजारे यांना म्हणाले.

हजारे म्हणाले, ‘शेतकरी कायदे, वाढती महागाई, बेरोजगारी याविरुद्ध लढा देण्यासाठी तुम्ही संघटन उभं करा. मला जेव्हा वाटेल तुम्ही योग्य मार्गानं जात आहात. तेव्हा मी तुमच्या आंदोलनात आवश्य सहभागी होईल. मी जागा आहे, मी काही झोपलेलो नाही. दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्याशी संपर्क केला नाही. तसेच शेतकरी प्रश्नी पाच वर्षांपासून आपण पाठपुरावा करीतच आहोत. केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनीही आपल्याला कृषी कायद्यांसंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमण्याचा शब्द दिला आहे. करोनामुळे समिती स्थापन झाली नाही. तरीही आपण पाठपुरावा करत आहोत,’ असंही अण्णा यांनी पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.


देश बचाव जन आंदोलन समितीचे पदाधिकारी अॅड. रवींद्र रणसिंग, रवींद्र देशमुख, मारुती भापकर, सागर आल्हाट, दुर्गा भोर, मुकुंद काकडे, अॅड. देविदास शिंदे यांनी हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या