लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी आपापल्या भागात जन आशीर्वाद यात्रा सुरू केल्या आहेत. या यात्रांना गर्दी होत
असल्यामुळं करोना संसर्गाची भीती व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे
खासदार संजय राऊत यांनी
भाजपवर जोरदार टीका केली आहे.
उद्धव
ठाकरे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल महाविकास आघाडी
सरकारमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे.
राज्यातील सरकार पडावं म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या भाजपच्या एकाही
मुख्यमंत्र्याचा या यादीत समावेश नाही. याचा अर्थ जनतेला विकास, न्याय हवा आहे. त्यांच्या
मागे ठामपणे उभं राहणारं सरकार हवं आहे. केवळ भावनिक घोषणा करून किंवा एखाद्याची
बदनामी करून कोणी लोकप्रिय ठरू शकत नाही हेच यातून सिद्ध झालंय,' असा टोलाही राष्ट्रवादीनं हाणला आहे.
0 टिप्पण्या