Ticker

6/Breaking/ticker-posts

भगवानगडासह ३५ गावे , वाड्याच्या नळपाणी पुरवठा योजनेला गती दया अन्यथा मत्रांलयासमोर उपोषणाचा सजंय बडेंचा इशारा

 




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार :  श्री क्षेत्र भगवानगड व ३५ गावे व त्याखालील वाड्यावस्त्या साठी महत्वाची असणारी प्रस्तावित नळ  पाणीपुरवठा योजने साठी बैठक आयोजित करून या प्रस्तावित नळपाणी पुरवठा योजने ला गती द्या    अन्यथा  मत्रांलयाच्या दारात  अमरण उपोषन करण्याचा इशारा भगवानगड परिसर नळ पाणी पुरवठा योजना संघर्ष कृती समिती  अध्यक्ष श्री. संजय  बडे यांनी दिला आहे 

  ग्रामविकास मंत्री  तथा अहमदनगर चे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांना यासंदर्भात सविस्तर  निवेदन वजा पत्र पाठविले आहे .पाथर्डी तालुक्यातिल  भगवानगड व परिसरातील ३५ गांवे व त्या खालील वाड्यांकरीता  जायकवाडी जलाशया मधुन  नळ पाणीपुरवठा योजना व्हावी अशी मागणी गेल्या आठ वर्षापासुन  होत आहेत .

 संघर्ष कृती समितीच्या वतीने शासन दरबारी गेल्या आठ वर्षापासून मागणी व वेळो वेळी पाठपुरावा केला जात आहे     पाथर्डी येथे  दि. १४/८/२०२१ रोजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी  आढावा बैठक घेतली होती त्या बैठकी मध्ये त्यांना निवेदन देवून  लक्ष वेधले होते. या मागणी बाबत  तालुक्यातिल सर्वच लोकप्रतिनिधींनी या योजनेबाबतची आवश्यकता मंत्री हसन मुश्रीफ यांच्या  निदर्शनास आणून दिली होती . तेव्हा मंत्री महोदयानी  भाषनात योजनेची सत्यता जाणून घेवून पुढील कार्यवाहीसाठी  पाणीपुरवठा व स्वच्छता   मंत्रालय मुंबई येथे ८ दिवसात बैठक आयोजीत करणेबाबत व योजनेला गती देणेबाबत आश्वासीत केले होते.

मात्र  बैठक होवून पंधरा दिवस झाले  असतांना देखील याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. जनतेच्या भावनेचा व लोकप्रतिनिधीच्या मागणीची दखत घेवून याबाबत विहीत मुदतीत दिलेल्या आश्वासनाप्रमाने बैठक आयोजीत करणे या संघर्ष कृती समितीला अपेक्षीत होते. मात्र  कार्यवाही होत असतांना दिसत नाही. त्यामुळे तातडीने याबाबत पाठपुरावा करुन  पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  यांचेकडे बैठक आयोजीत करावी व योजना मार्गी लावावी. अन्यथा  याबाबत सोमवार दि. १३/९/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता मंत्रालयाच्या गेटवर संघर्ष कुती समिती उपोषण करणार  आहे  उपोषण दडपण्याचा प्रकार जर घडला तर त्यावेळी घडणाऱ्या घटनेची जबाबदारी शासणाची राहणार आहे

 पाणीयोजनेसाठी राजकारण विरहीत संघर्ष 

– संजय बडे 

भगवानगड परिसरासाठी प्रस्तावित ३५ गावांच्या पाणीयोजनेला चालना मिळावी यासाठी गेली ८ वर्ष पाठपुरावा करत आहोत .

भगवानगडावरून पैठण धरणाचे पाणी दिसते परंतु याच परिसरातील ३५ गावामध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्चून टॅकरवर विसंबून रहावे लागते,बारमाही असणारी दुष्काळी परीस्थिती बदलण्यासाठी या परिसरात पिण्यासाठी  पैठण धरणातुन पाणी यावे म्हणून  २०१४ साली मा.ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची भेट घेवून पाणी योजना प्रस्ताव बनवून सर्व्हेक्षण व आराखडा बनवला .   परंतु पुढे सत्ताबदल होताच पाणीयोजना मागे पडली  .परिसरावर अन्याय झाला आहे.

आता जिल्हा चे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी  आठ दिवसात बैठक घेऊन प्रस्तावित योजनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासण देऊन पधंरा दिवस लोटले आहेत आता  राजकारण विरहीत लढा उभारून,भावनिक राजकारणाला मुठमाती देवून पाणी योजना प्रत्यक्षात अमलात आणन्यासाठी संघर्ष सुरू ठेऊ  असे संजय बडे यांनी सांगितले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या