Ticker

6/Breaking/ticker-posts

IND vs PAK; ५ वर्षानंतर होणार क्रिकेटमधील सर्वात हायव्होटेज सामना

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 दुबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणतीही लढत ही हायव्होटेज असते. ही लढत जर वर्ल्डकपमधील असेल तर मग त्याचा थरार आणखी वाढतो. या दोन्ही देशात द्विपक्षीय मालिका बंद असल्याने फक्त आयसीसीच्या लढतीत चाहत्यांना चुरस पाहण्याची संधी मिळते. आता टी-२० वर्ल्डकपमध्ये हे दोन्ही संघ एकाच गटात आले आहेत.

आयसीसीने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठीचे दोन ग्रुप जाहीर केलेत. ग्रुप २ मध्ये भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान हे संघ आहेत. तर ग्रुप १ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघात १९ मार्च २०१६ रोजी अखेरची टी-२० लढत झाली होती. तेव्हा टी-२० वर्ल्डकपमध्ये कोलकाता येथील लढतीत भारताने पाकिस्तानचा ६ विकेटनी पराभव केला होता.

आयसीसीच्या स्पर्धेत कोणत्याही सामन्यापेक्षा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत सर्वाधिक पाहिली जाते. आतापर्यंत झालेल्या ६ टी-२० वर्ल्डकपमध्ये  फक्त दोन वेळा २००९ आणि २०१० मध्ये या दोन्ही संघात लढत झाली नाही. २००७च्या वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघांत फायनलसह दोन लढती झाल्या होत्या. २०१२ मध्ये सुपर-८ आणि २०१४ व २०१६ मध्ये ग्रुप फेरीत या दोन्ही संघात लढती झाल्या होत्या.

पुढील ४८ तासात होणार वेळापत्रकाची घोषणा

आयसीसीकडून पुढील ४८ तासात टी-२० वर्ल्डकपच्या वेळापत्रकाची घोषणा होऊ शकते. भारतीय क्रिकेट मंडळाचे अधिकारी सध्या UAE आणि ओमन दौऱ्यावर आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या