Ticker

6/Breaking/ticker-posts

उपमहापौर गणेश भोसले यांनी आदेश देताच शहरात पॅचिगंचे काम सुरु

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर: शहरांमध्ये अमृत भुयारी गटार योजनेचे काम पावसाळा संपेपर्यंत थांबविण्याच्या सूचना उपमहापौर गणेश भोसले यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिल्या असता आज याची दखल घेत मध्यवर्ती शहरांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी अमृत भुयारी गटार योजनेसाठी खोदकाम केले आहे त्या-त्या ठिकाणी खड्डे बुजवणे व पॅचिगंचे काम सुरु केले आहेत.

 शहरांमध्ये केंद्र शासनाची अमृत भुयारी गटार योजनेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. मध्यवर्ती शहरामध्ये विविध ठिकाणी पाईप टाकण्यासाठी खोदकाम झाले आहे .त्यामुळे खोदकाम झाल्यानंतर ती माती रस्त्यावर टाकली जाते पावसाच्या पाण्यामुळे चिखल होऊन रस्त्यावर छोटेमोठे अपघात होतात नागरिकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते.

 याचबरोबर भुयारी गटार योजनेचे काम जेसीबी यंत्राच्या साहाय्याने केल्यामुळे मध्यवर्ती शहरांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत.नागरिकांना पायीचालणेही कठीण झाले आहे. याची उपमहापौर गणेश भोसले यांनी दखल घेत सदरील आदेश दिले. त्यानुसार जोपर्यंत खोदकाम केलेले पॅचिगंचे काम सुरू होत नाही तोपर्यंत पुढील उर्वरित काम न करण्याचे सूचना आयुक्त शंकर गोरे यांना दिल्या होत्या त्यानुसार आज कामाला शहरात ठीक-ठिकाणी सुरुवात झाली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या