Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यातील लॉकडाऊनमध्ये १ जूनपर्यंत वाढ; काय आहेत नवीन नियम ?

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )

मुंबईः करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी १ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. यासंबंधी राज्य सरकारकडून नवीन नियमावली आज जारी करण्यात आली आहे.

राज्‍यात लॉकडाऊन लावण्याआधी रुग्‍णांची संख्या सात लाखांपर्यंत पोहचली होती. मात्र लॉकडाउननंतर ही संख्या चार लाख ७५ हजारापर्यंत खाली आली. देशाचा रुग्‍णवाढीचा दर १.४ आहे, तर राज्‍यात तो ०.८ पर्यंत आहे. देशातील ३६ राज्‍यांच्या तुलनेत महाराष्‍ट्राचा याबाबत ३० वा क्रमांक आहे. त्‍यामुळे निर्बंधांचे सकारात्‍मक परिणाम दिसून आल्‍याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुतांश मंत्र्यांनी निर्बंध अधिक वाढवावेत, अशी विनंती केली होती. अखेर, राज्य सरकारने आज याबाबत निर्णय घेतला असून १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १४ एप्रिलपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यानंतर ३० एप्रिलला लॉकडाऊनच्या निर्बंधांची मुदत संपल्यानंतर लॉकडाऊनमध्ये १५ मेपर्यंत वाढ करण्यात आली होती. राज्यात लॉकडाऊननंतर रुग्णसंख्या नियंत्रणात येत असल्याचं चित्र असल्यामुळं आणखी काही दिवस लॉकडाऊन वाढवण्यात यावा, अशी भूमिका मंत्र्यांनी घेतली होती. त्यानंतर आज लॉकडाऊनसंदर्भात नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत. तर, काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

काय आहेत नवीन नियम?


* परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना ४८ तासाआधीचा आरटीपीसीआर अहवाल बंधनकारक असणार आहे.

*राज्य सरकारने घोषित केलेल्या संवेदनशील राज्यातून येणाऱ्यांसाठी आरटी-पीसीआर अहवाल बंधनकारक

*मालवाहतूक ट्रकमध्ये केवळ एक ड्रायव्हर व एका क्लिनरलाच प्रवेश मिळणार

*बाजारपेठेत गर्दी झाल्यास स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाने त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे

*दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांना निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे

*विमानतळ आणि बंदरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल मेट्रो आणि मेट्रोमध्ये प्रवासाची मुभा

*इतर राज्यातून महाराष्ट्रात मालवाहतूक करणाऱ्यांना आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवाल असावा तो अहवाल ७ दिवस ग्राह्य धरला जाणार



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या