Ticker

6/Breaking/ticker-posts

‘चाकणकर काही विखेंचा पिच्छा सोडायला तयार नाहीत’

 







लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अ.नगर: दिल्लीहून रेमडेसिवीर आणल्याप्रकरणी जिल्ह्याबाहेरील व्यक्तीला उत्तर द्यायला आपण बांधिल नाहीत, असे सांगून नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे प्रश्न टोलावून लावले आहेत. मात्र, तरीही चाकणकर विखेंचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. त्यांनी या विषयावर पुन्हा ट्विट करून विखेंसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टार्गेट केले आहे.

चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, 'खासदार सुजय विखे डॉक्टर आहेत. डॉक्टरांना जीवाचे मोल असते. मानवतेच्या भावनेतून विखेंनी कुठे लस मिळते ते सांगावे, याचा फायदा सर्वांनाच होईल. नगर जिल्हा हा महाराष्ट्रातच आहे. आमच्याकडेही लोक इंजेक्शनबद्दल विचारतात. तुम्ही आम्हालाही रेमडेसिवीर कसं आणायचं हे सांगाल ही अपेक्षा आहे.', असं चाकणकर यांनी म्हटलं आहे. 

तर, दुसऱ्या एका ट्विटमध्ये चाकणकर यांनी म्हटले आहे, 'खासदार विखे यांनी आणलेली दहा हजार 'रेमडेसिविरची इंजेक्शन' आणि सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेबांचा 'विकास' यामध्ये एकच साम्य आहे, ते म्हणजे दोन्हीचे लाभार्थी अजून कुणालाच दिसले नाहीत. तब्बल दहा हजार इंजेक्शनच्या बाबतीत संशय निर्माण झाल्याने या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हावी व सत्य समोर यावे हीच आमची भूमिका आहे.', अस चाकणकर यांनी म्हटल आहे.

डॉ. विखे यांनी दिल्लीहून खासगी विमानातून रेमडेसिविर इंजेक्शन्स आणून नगर जिल्ह्यातील रुग्णालयांना दिली. त्यांनी स्वत:च तसा एक व्हिडिओ प्रसारीत केला. यावर चाकणकर यांनी शंका घेऊन ह्या बॉक्समध्ये नेमके काय आणले, इंजेक्शन आणली असतील तरी ती कोठून आणली, कोणाला वाटली हे जाहीर करावे, अशी मागणी केली होती. विखे यांनी या प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ करून जनतेची चेष्ठा करणे थांबवावे, असे चाकणकर यांनी म्हटले होते. 

त्यावर डॉ. विखे यांनी चाकणकर यांचे नाव न घेता उत्तर दिले होते. आपण केवळ जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बांधिल आहोत. जिल्ह्याबाहेरील व्यक्तीला उत्तर देण्याची गरज नाही, असे म्हटले होते. मधल्या काळात या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे. त्यानंतर चाकणकर यांनी पुन्हा या विषयावर भाष्य केले आहे.  

दरम्यान राजकीय आरोपांचं हे चऱ्हाट खा . विखें पर्यंत ठिक परंतु चाकणकर यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका करण म्हणजे जरा‘ अति जहालं अन् हसू आलं’ या सदरात मोडणारं आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात होवु लागली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या