Ticker

6/Breaking/ticker-posts

जगाच्या पाठीवर समृद्ध असलेली मराठी भाषा- प्राचार्य डॉ. झावरे

 

मसापच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर- जगाच्या पाठीवर जवळजवळ बारा  कोटी लोक मराठी बोलतात महाराष्ट्रात नव्हे तर प्रत्येक राज्यात आणि विविध देशांमध्ये जिथे जिथे मराठी माणूस पोहोचला तेथे मराठी भाषा पोहोचली आहे, मात्र आपली मातृभाषा अधिक समृद्ध करण्यासाठी अमराठी भाषिकांपर्यंत जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन  न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे यांनी व्यक्त केले.

 महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखेच्यावतीने आज मराठी भाषा दिन व व कवी कुसुमाग्रज जयंती प्रयत्न नर्सिंग कॉलेज येथे साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के होते.

 डॉक्टर झावरे पुढे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. यासाठी सामुदायिक प्रयत्न होणे गरजेचे आहे जो जो मराठी बोलतो, लिहितो आणि ऐकतो त्याने पुढाकार घेऊन एक व्यापक चळवळ राबवली पाहिजे आपल्याला आपल्या मातृभाषेविषयी अभिमान हवा इतर भाषा  या अभ्यासक्रमात असतात पण रोजच्या जगण्यात आपण मराठी बरोबर जगतो त्यामुळे प्रत्येकाने मराठी बोलताना मराठी साहित्याचे वाचन, मनन आणि चिंतन केले पाहिजे आजची पिढी ही फक्त मराठी बोलते. पण मराठी साहित्याचे वाचन करत नाही त्यामुळे ते स्पर्धेत मागे पडतात मराठी साहित्य हे जीवन जगण्याची भाषा शिकवते. हे नव्या पिढीने लक्षात घेतले पाहिजे मराठी भाषा ही संस्कारी भाषा आहे ती जरी बारा मैलावर बदलत असली तरी त्या सर्वांच्या मागे एकच अर्थ आहे तो समजून घेतला पाहिजे महाराष्ट्र साहित्य परिषद मराठी भाषा रुजवण्याचे काम करत आहे त्यातील उल्लेखनीय बाब आहे यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिका मेधाताई काळे म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षापासून मराठी माणूस मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे साठी प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नांना यश येणे अत्यंत गरजेचे आहे. 

आपल्या भाषेतील साहित्य हे अनुवादित होऊन इतर भाषेत व देशाच्या विविध भाषेत रुपांतरीत झाली तर आपल्या भाषेची ताकद सर्वांच्या लक्षात येईल असे प्रतिपादन केंद्रीय कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत पालवे यांनी यावेळी केले.

 यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के म्हणाले की महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखा ही साहित्य संवर्धनाचे व मराठी भाषा व साहित्य रुजवण्याचे काम करीत आहे नव्या पिढीने साहित्याचे वाचन केले पाहिजे. 

यावेळी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व कवी चंद्रकांत पालवे, कार्याध्यक्ष किशोर मरकड प्रा. रवींद्र देवढे,प्रा. चंद्रकांत जोशी, रत्ना वाघमारे यांनी केले तर कार्यकारिणी सदस्य व ज्येष्ठ कवी अरविंद ब्राह्मणे यांनी संकलित केलेल्या जुन्या म्हणी सादर करून रसिकांची दाद मिळवली प्रारंभी स्वागत उपाध्यक्ष डॉक्टर शीतल मस्के यांनी केले तर प्रास्ताविक कार्याध्यक्ष किशोर मरकड यांनी केले

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खजिनदार दशरथ खोसे तर आभार प्रकल्पप्रमुख  श्याम शिंदे यांनी मानले या कार्यक्रमात धमाका दिवाळी अंकास पारितोषिक मिळाल्याबद्दल संपादक नसीर शेख, केंद्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल कवी चंद्रकांत पालवे ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाट्य कला सेलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्याम शिंदे यांचे कार्यवाह चंद्रकांत जोशी यांना पदोन्नती मिळयाबद्दल व महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक संघटनेच्या राज्य कार्यकारिणी  कार्याध्यक्ष किशोर मरकड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी मसाप तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पारितोषिक मिळवणाऱ्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये प्रथम क्रमांक श्रद्धा वझे, द्वितीय क्रमांक  अशोक सप्तर्षी, तृतीय क्रमांक शरद धलपे, सौ वैशाली धर्माधिकारी उत्तेजनार्थ रोहिणी बनकर, बलभीम शिंदे ,दिलीप साळी, विशेष निबंध उषा सोलंकर, जयश्री खिस्ती यांना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. निबंध स्पर्धेचे परीक्षण कार्यवाह प्राध्यापक चंद्रकांत जोशी यांनी केले होते . प्रारंभी स्वागत उपाध्यक्ष डॉक्टर शीतल म्हस्के यांनी केले. तर आभार श्याम शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खजिनदार दशरथ खोसे यांनी केले. यावेळी साहित्यिक कार्यकारिणी सदस्य व सभासद उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या