मसापच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर- जगाच्या पाठीवर जवळजवळ बारा कोटी लोक मराठी बोलतात महाराष्ट्रात नव्हे तर
प्रत्येक राज्यात आणि विविध देशांमध्ये जिथे जिथे मराठी माणूस पोहोचला तेथे मराठी
भाषा पोहोचली आहे, मात्र आपली मातृभाषा अधिक समृद्ध
करण्यासाठी अमराठी भाषिकांपर्यंत जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे
प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे यांनी व्यक्त केले.
डॉक्टर झावरे पुढे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. यासाठी सामुदायिक प्रयत्न होणे गरजेचे आहे जो जो मराठी बोलतो, लिहितो आणि ऐकतो त्याने पुढाकार घेऊन एक व्यापक चळवळ राबवली पाहिजे आपल्याला आपल्या मातृभाषेविषयी अभिमान हवा इतर भाषा या अभ्यासक्रमात असतात पण रोजच्या जगण्यात आपण मराठी बरोबर जगतो त्यामुळे प्रत्येकाने मराठी बोलताना मराठी साहित्याचे वाचन, मनन आणि चिंतन केले पाहिजे आजची पिढी ही फक्त मराठी बोलते. पण मराठी साहित्याचे वाचन करत नाही त्यामुळे ते स्पर्धेत मागे पडतात मराठी साहित्य हे जीवन जगण्याची भाषा शिकवते. हे नव्या पिढीने लक्षात घेतले पाहिजे मराठी भाषा ही संस्कारी भाषा आहे ती जरी बारा मैलावर बदलत असली तरी त्या सर्वांच्या मागे एकच अर्थ आहे तो समजून घेतला पाहिजे महाराष्ट्र साहित्य परिषद मराठी भाषा रुजवण्याचे काम करत आहे त्यातील उल्लेखनीय बाब आहे यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिका मेधाताई काळे म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षापासून मराठी माणूस मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे साठी प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नांना यश येणे अत्यंत गरजेचे आहे.
आपल्या भाषेतील साहित्य हे अनुवादित होऊन इतर भाषेत व देशाच्या
विविध भाषेत रुपांतरीत झाली तर आपल्या भाषेची ताकद सर्वांच्या लक्षात येईल असे
प्रतिपादन केंद्रीय कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत पालवे यांनी यावेळी केले.
यावेळी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन साहित्य
परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व कवी चंद्रकांत पालवे, कार्याध्यक्ष किशोर मरकड प्रा.
रवींद्र देवढे,प्रा. चंद्रकांत जोशी, रत्ना
वाघमारे यांनी केले तर कार्यकारिणी सदस्य व ज्येष्ठ कवी अरविंद ब्राह्मणे यांनी
संकलित केलेल्या जुन्या म्हणी सादर करून रसिकांची दाद मिळवली प्रारंभी स्वागत
उपाध्यक्ष डॉक्टर शीतल मस्के यांनी केले तर प्रास्ताविक कार्याध्यक्ष किशोर मरकड
यांनी केले
0 टिप्पण्या