Ticker

6/Breaking/ticker-posts

हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे



 लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

 पाथर्डी:-भाजप सरकारच्या काळात सुरू केलेल्या अनेक लोक कल्याणकारी योजना बंद करण्याचा सपाटा आघाडी सरकारने लावला आहे.शेतकऱ्यांच्या हिताची असणारी सिंगल फेज योजना देखील या सरकारने बंद केल्याने हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे काय अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली.

              राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून वीज बिलाचे कारण सांगून शेती व घरगुती वीज पुरवठा खंडित करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ आमदार राजळे यांनी कार्यकर्त्यांसमवेत विद्युत विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केले.यावेळी आ.राजळे बोलत होत्या.आंदोलनात भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर,नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे,पं..सभापती गोकुळ दौंड,जि..सदस्य राहुल राजळे,माजी जि..सदस्य सोमनाथ खेडकर,भगवान साठे,जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशीबाई गोल्हार,उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,पं..सदस्य विष्णुपंत अकोलकर,सुभाष केेकाण,सुनिल ओव्हळ,एकनाथ आटकर,चारूदत्त वाघ,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर,नगरसेवक प्रवीण राजगुरू,रमेश गोरे,मंगलताई कोकाटे,बजरंग घोडके,अनिल बोरुडे,महेश बोरुडे,नामदेव लबडे,बबन बुचकुल,ॲड.संपत गर्जे,डॉ.सुहास उरणकर,

वसंत पवार,बाळासाहेब आकोलकर,माजी नगरसेवक बंडू बोरुडे,प्रमोद भांडकर,पांडुरंग सोनटक्के,किशोर परदेशी,बाबासाहेब किलबिले,अभिजीत गुजर,अजय रक्ताटे,प्रसिध्दी प्रमुख नारायण पालवे,युसुफ शेख,बंडू पठाडे,जमीर आतार,आदीसह भाजपाचे कार्यकर्ते शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. 

   यावेळी बोलताना आ.राजळे म्हणाल्या की,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्री यांच्यामध्येच एकमत नाही.सकाळ,दुपार,संध्याकाळ वेगवेगळी वक्तव्य यांच्याकडून करण्यात येत आहेत.विद्युत विभागाचा पूर्णपणे अनागोंदी कारभार चालू आहे.खराब झालेले विद्युत रोहित्र दोन ते तीन महिने दुरुस्त होत नाहीत.वायरमन काम करत नाहीत  शेतकरी पैसे भरायला तयार असताना देखील त्यांना वीज जोड मिळत नाही तसेच शेतकरी वीज बिलाचे टप्प्याटप्प्याने पैसे भरायला तयार आहेत.त्यांनीदेखील हे सरकार शेतकऱ्यांची वीज  खंडित करण्याचे महापाप करत आहे.अनेक ठिकाणी जुने केबल जळून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित होत आहे.यामुळे हातातोंडाशी आलेली गहू,हरभरा यासारखी पिके जळून जाण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो.मंत्र्यांमधेच एकमत नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी हे आघाडी नव्हे तर बिघाडी सरकार ठरत असून या सरकारचा आपण तीव्र निषेध करीत आहोत.याची विद्युत विभागाने व सरकारने वेळीच नोंद घेऊन कुणाचेही वीज जोड न तोडता अखंडपणे वीजपुरवठा द्यावा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.याबाबत वरिष्ठांकडे आपल्या भावना पोहोचवून अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे उपकार्यकारी अभियंता निलेश मोरे म्हणाले.

 वीज वितरणच्या कारभाराबद्दल उपस्थीतांनी आ.राजळे व सहाय्यक अभियंता निलेश मोरे यांच्या समोरच तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर आ.राजळे यांनी तत्काळ सोमवार दि. ८ फेब्रुवारी २१ रोजी गण व गट निहाय आढावा बैठक आयोजीत करण्याचे आदेश दिले.तसेच नागरिकांनी आढावा बैठकीत उपस्थित राहुन आपल्या तक्रारी मांडाव्यात असे आवाहनही आ.राजळे यांनी यावेळी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या