Ticker

6/Breaking/ticker-posts

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खो-यात वळविणेचे काम प्रगती पथावर ..

 









लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 

              नेवासा-/भेंडे :- सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील पावसाचे समुद्रात जाणारे पाणी पश्चिम वाहिनी नद्यातुन पुर्वेकडे  गोदावरी खो-यात वळविण्यासाठी ३० प्रवाही वळण योजना व २ नद्या जोड योजनेतुन १९ .१८ टि.एम.सी.पाणी देण्याची महत्वपुर्ण योजना प्रगती पथावर असल्याचे पत्र लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे सहाय्यक अधिक्षक अभियंत्यांनी नेवासा तालुका भारतीय जनसंसदला पाठविले आहे .

         नेवासा तालुका भारतीय जनसंसदचे अध्यक्ष रामराव भदगले , अशोक ढगे , कारभारी गरड यांनी या महत्वाच्या मागणीसाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार , आंदोलन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस  ,  विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे व संबंधितांना भेटुन वेळोवेळी पाठपुरावा केला होता. नुकतेच भदगले यांना मिळालेल्या पत्रात योजनेची सद्यस्थिती सविस्तर कळविली आहे. ३० प्रवाही वळण योजनेपैकी १२ योजना पुर्ण झाल्या आहेत. तसेच ७ प्रवाही योजना प्रगती पथावर असुन भविष्यकालीन ११ प्रवाही योजनांपैकी काहिंचे सर्वेक्षण झाले असुन अंदाजपत्रक डिसेंबर २०२० अखेर सादर केले आहेत .त्यातील निविदा प्रक्रिया प्रगती पथावर आहेत. तर काहिंचे सर्वेक्षण निविदा प्रगती पथावर आहेत. 

  पुर्ण झालेल्या १२ प्रवाही योजना - रानपाडा , चाफ्याचा पाडा , हट्टीपाडा , पळसविहीर , चिल्लरपाडा ,गोळशी ,झालापाडा ,आंबेगण संकुल ,पिंपरज ,अंबोली बोंबिलटेक ,वाघेरा ,वळुंजे इत्यादी . 

   प्रगती पथावरील ७ प्रवाही वळण योजना - मांजरपाडा, धोंडाळपाडा , ननाशी , पायरपाडा ,गोळशी महाजे ,पँगलवाडी ,वैतरणा  इत्यादी.  भविष्यकालीन ११ प्रवाही वळण योजना - अंबाड ,चिमणपाडा ,कळमुस्ते ,अंबोली वेळुजे , कापवाडी , हिवरा ,साभद , तोलारखिंड , खिरेश्वर ,सादडापाट ,पाथरपाट इत्यादी. 

  राज्यांतर्गत नदि जोड योजनेच्या २ प्रवाही वळण योजना दमणगंगा - एकदरे - गोदावरी आणि दमणगंगा - वैतरणा - कडवा - गोदावरी . या २ योजनेचे १२ .१८ टि.एम.सी.पाणी दमणगंगा वैतरणा खो-यातुन वाघाड धरण व उर्ध्व वैतरणा धरणात येणार आहे. यांचे सर्वेक्षण व अन्वेषण अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता असुन हे काम राष्ट्रिय जल विकास अभिकरण नवि दिल्ली यांचे मार्फत प्रगती पथावर अहे.

     दमणगंगा , पार , वैतरणा व उल्हास या ४ पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पुर्वेकडील गोदावरी खो-यात वळविण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातील , भंडारदरा व मुळा धरणात हे पाणी येणार आहे . यामुळे नगर जिल्ह्यासह औरंगाबाद , बिड , नांदेड आदि जिल्ह्यांतील पाणी समस्या दुर होण्यास चांगलाच हातभार लागणार आहे .

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या