Ticker

6/Breaking/ticker-posts

वृक्षदान हीच चळवळ व्हॉवी- गोकुळ दौंड


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 पाथर्डी:-रक्तदानाप्रमाणेच वृक्षदान हा एक चांगला सामाजिक‍ उपक्रम असुन तो प्रत्येक गावामध्ये राबविण्याची गरज असल्याचे मत भाजपाचे नेते गोकुळदौंड यांनी कळसपिंप्री येथे छात्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अनोख्या वृक्षदान कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन करतांना केले यावेळी 101 केशर जातीच्या आंबा रोपांचे वाटपांचे वाटप ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यातआले.

        वृक्षसंवर्धन ही काळाची गरज झाली असुन शिवजयंती तसेच आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वाढ दिवसानिमित्ताने कळसपिंप्री येथील ग्रामपंचायतीच्यावतीन डि.जे किंवा इतर कुठल्याही अनावश्यक खर्च न करता उत्कृष्ठ जातीच्या केशर आंब्यांच्या रोपांचे गावक-यांना वाटप करण्यात आले असुन या रोपांचे संगोपन एक वर्ष पुर्ण करणा-या गावक-यांचा पुढील शिवजयंतीला सत्कार करुन त्यांना पुन्हा दहा फळझाडे देण्याचे येणार असुनही निरंतर स्वरुपाच चळवळ राबविण्यात येणार असल्याने या चळवळीचा आदर्श इतर गावांनी घ्यावा असे मत यावेळी गोकुळ दौंड यांनी व्यक्त केले,

         यावेळी सेवा संस्थेचे चेअरमन नवनाथ भवार, टाकळीमानुर ग्रामपंचायतचे सरपंच शुभम भैया गाडे, वृध्देश्वर चे संचालक, बाबासाहेब किलबीले, कोरडगाव सेवा संस्थेचे चेअरमन,नारायणराव काकडे, युवा नेते दिगंबर भवार,उपसरपंच संजय पवार,भानुदास शेळके, दत्तात्रय गणगे, बाबासाहेब मिसाळ, शिवजीराव मिसाळ, शिवाजी शेळके, अमिनभाई शेख, लक्ष्मण तरटे, महादेव भराट, सुभाषराव गाडे, दादासाहेब मापारे, मुरलिधर येढे,नरहरी शेळके, लक्ष्मण तरटे, आदि उपस्थित होते.  

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या