Ticker

6/Breaking/ticker-posts

हे बघा ..हे पठ्ठे..! आता यांच्या पुढं काय डोकं फोडून घेऊ ?


 





लोकनेता न्यूज

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

राहूरी : -  वांबोरीतील सभेत मास्क नसलेले लोक पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पारा चढला अन् जाहिर भाषणात  . ''हे बघा.. हे पठ्ठे, येथे बिनमास्कचे फिरत आहेत. आता त्यांच्यापुढे डोके फोडून घेऊ का? " असा खास दादा शैलीत समाचार घेऊन संताप व्यक्त केला. याची दिवसभर चर्चा रंगली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काल नगर जिल्ह्याल्च्या दौऱ्यावर होते , नगर , श्रीगोंदा व राहूरी येथे विविध उद्घाटन  कार्यक्रम , सभा पार पडल्याा  अनेक ठिकाणी मास्कचा वापर होत नाही हे त्यांनी अचूक हेरले विशेषतः तरुण मंडळी मास्कच वापरत नसल्याची बाब त्यांना प्रकर्षाने जाणवली. वांबोरीतील सभेत मास्क नसलेले लोक पाहून त्यांचा पारा चढला अन् जाहिर भाषणात त्यांनी सुनावलेे . अजित पवार चांगलेच भडकले. 'हे बघा हे पठ्ठे, येथे बिनमास्कचे फिरत आहेत. आता त्यांच्यापुढे डोके फोडून घ्यावे का, असा सवाल व्यक्त करीत आपल्या खास शैलीत त्यांचे कान टोचले.

वांबोरी येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत बोलताना अजित पवार म्हणाले कि, कोरोना आणि त्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वांचेच हाल झाले. त्यातूनही मार्ग काढत राज्य सरकारने उपाययोजना केल्या. पुरेशी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, या काळात आर्थिक विकासाचा दर खाली आला. सरकारी तिजोरीत पैसे येणे कमी झाल्याचे सांगत अर्थसंकल्पात जे ठरविले, तेवढेही पैसे येत नव्हते. केंद्र सरकारकडे २५ हजार कोटी रुपये येणे बाकी आहेत. तरीही आपले महाविकास आघाडीचे सरकार वचन पाळणारे सरकार आहे.

उपलब्ध पैशांत कामे सुरूच ठेवली. राज्य सरकारचा सर्वांत मोठा खर्च पगार आणि निवृत्ती वेतनावर होतो. दरमहिन्याला सुमारे १२ हजार कोटी रुपये यासाठी लागतात. त्यानंतर उरलेल्या पैशातून कामे करावी लागतात. असे असले तरी कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. कोरोनाला हसण्यावारी घेऊ नका. आपण कोरोनाची काळजी घेणे आवश्यक आहे. असे असले तरी अद्यापही अनेक जण दुर्लक्ष करीत आहेत. येथेही हे बघा अनेक पठ्ठे बिनामास्कचे आले आहेत. ज्यांनी मास्क लावले आहेत, त्यातील अनेकांनी येथे वाटलेले मास्क लावल्याचे दिसून येत आहे. असे करू नका. ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी नागरिकांना केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या