Ticker

6/Breaking/ticker-posts

अन्यथा.. “ओपीडीत उपचार नाही, तर डायरेक्ट ऑपरेशन”

 अहमदनगर,:  - मागील 20 ते 25 वर्षांत काय झालेयाकडे आपण लक्ष देत नाही, आपला भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे, वैचारिक मतभेद असू शकतात. त्यामुळेच विविध राजकीय पक्षसंघटना उदयास येत आहेत. मात्र समोरच्याचे मत ऐकूण घेवून त्याचा आदर करण्यासाठी मोठे मन लागते. परंतु जो माझा नाहीत्याला कसेही करून चिरडून टाकण्याची जी विकृत्ती आहेती येथून पुढे चालणार नाही. ज्यांची घरे काचेची आहेतत्यांनी दुसर्‍यांच्या घरावर दगडे मारू नये. कामे करताना राजकारण करावे पण ते विकासाच्या मुद्द्यावर करावे. एखाद्याचा संसार उघडा पाडण्यासाठी करू नये. अन्यथा ओपीडीत उपचार नाहीतर डायरेक्ट ऑपरेशन केले जाईलअसा इशारा नगरविकासमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

            नगरविकासउच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा राहुरी-नगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी प्रजाक्त तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाट व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्धवराव दुसुंगे होते. व्यासपीठावर जि. प. सदस्य शरद झोडगेअमोल जाधवरघुनाथ झिनेगोविंद मोकाटेबाळासाहेब हराळसंदेश कार्लेराजेंद्र भगतरोहिदास कर्डिलेबाळासाहेब कराळेकिसन लोटकेसूर्यभान पोटेआशाताई निंबाळकरबबनराव पटारेसीताराम काकडेशिवाजी चव्हाणप्रवीण कोकाटेनंदकुमार गागरेराम कदमविजय कदमसंतोष पटारे उपस्थित होते.

            तनपुरे म्हणालेकुणाला किती त्रास झाला आहेहे नगर तालुक्याने पाहिले आहे. त्यांनी त्रास दिल्यानेच ते आता आजी नाहीतर माजी आहोतयाचे भान त्यांनी ठेवावे. जिल्हा बँकेची निवडणूक लागली आहे. त्यामुळे नगर तालुक्यासाठी चांगला पर्याय उभा करणार आहोत. जिल्हा बँक अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन करावे लागतेही शोकांतिका आहे. त्यामुळे खरी काय परिस्थिती आहेहे जनता ओळखून आहे. त्यामुळे जिल्हा बँकेवरही महाविकास आघाडीचाच झेंडा फडकेलअसा दावाही त्यांनी केला.

            राहुरी-नगर मतदारसंघासह जिल्ह्यात शेतकर्‍यांसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी नुकतीच नगर तालुक्यातील डोंगरगण येथे पाहणी केली. त्यामुळे शेतकर्‍यांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे. मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणींचे तत्काळ निवारण करण्यासाठी शेंडी येथे जनसंपर्क कार्यालय उभारले असूनतेथे दर शनिवारी उपस्थित राहणार आहे.

            उद्धव दुसुंगे म्हणालेगेल्या 20 वर्षांपासून आजी आमदारांना माजी करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र ते दादागिरी मुळे माजी होतच नव्हते. आता मात्र ते माजी झाले आहेत. त्यामुळे दात पडलेल्या वाघाला घाबरण्याचे काही कारण नाहीअसा टोला माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे नाव न घेता लगावला.

रोहिदास कर्डिले म्हणालेमतदारसंघातून निवडणून आलेले आमदार हे सहा खात्यांचे मंत्री आहेत. त्यामुळे जिल्ह्यासह मतदारसंघाचा प्रश्‍न सुटणार आहे. नगर शहरात जनसंपर्क कार्यालय न उघडता ग्रामीण भागत त्यांनी ते उघडल्याने जनतेचे प्रश्‍न तत्काळ सुटण्यास मदत होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्लेशरद झोडगेरघुनाथ झिनेराजेंद्र भगतअमोल जाधवसीताराम काकडेआशाताई निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या