Ticker

6/Breaking/ticker-posts

जि.प.निवडणुकीत विरोधकाना चारी मुंडया चित करु-आ. निलेश लंके

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पारनेर: "राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आतापर्यंत अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे, भविष्यातही अनेक प्रवेश होणार आहेत. आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन चालायचं आहे. विधानसभेच्या निवडणूकीत कोणी आपल्याबरोबर नसेलही, विरोधात काम केले असेल. त्यावेळी आपण त्यांची सेवा करण्यास कमी पडलो असू. आता आपल्या सोबत चांगल्या विचारांची लोकं येणार असतील, दुसऱ्यांच्या खिशांवर डोळा ठेवणारे नसतील ! अशा लोकांना आपण बरोबर घेणार आहोत. येत्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. राज्यात काय होईल ते होईल आपल्या विरोधात मात्र सर्व असंतुष्ट आत्मे राहणार आहेत. त्या सर्वांना आपण चारी मुंडया चित करीत असतो." असेही आ. लंके म्हणाले. 

 मांडओहळ धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर जलसंपदा विभागाचे अधिकारी उपविभागिय अभियंता  व्हि टी शिंदे, शाखा अभियंता ए बी मोरे यांच्या उपस्थितीत आ. लंके यांच्या हस्ते जलसाठयाच्या विधीवत पुजन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आ. लंके यांनी विरोधकांवर विरोधकांवर जोरदार टिकाश्र सोडले. पुढे ते म्हणाले की "मी निधी मंंजुर करून आणतोय, माझ्या परस्पर कोणीही बोर्ड लावतंय, नारळ फोडतंय आणी पेपरला बातमी छापून आणली जातेय ! याला काय अर्थ आहे ? लोक वेडे आहेत का ? पैसा राज्य सरकारचा, मी सरकारचा प्रतिनिधी. त्यामुळे माझ्याच माध्यमातून निधी येणार ना ? कामाचा शुभारंभ करताना अधिकारी नाहीत, ठेकेदार नाहीत हे लोकांना कळत नाही का ? तालुक्यात असंच चोरट्या, भामट्या सारखे बोर्ड लावायचे, पळत पळत जावून नारळ फोडायचा आणी घाई घाईने गाडीत बसून निघून जायचं असा कार्यक्रम सध्या सुरू आहे".

"जलपुजनाचीही अशीच स्पर्धा सुरू झाली आहे. सकाळी एक गट, दुपारी दुसरा गट तर संध्याकाळी तिसरा गट जलपुजन करीत आहे. आरे हे काय चाललं आहे फक्त पेपरबाजीसाठीच ना ?तुमचं समाजासाठी काय योगदान आहे ? तुम्ही जे काही समाजासाठी केलं आहे ते स्वतःच्या टक्केवारीसाठीच केलंय दुसरं काय ? वेगळं काय आहे तुम्ही जिल्हा परीषदेच्या माध्यमातून जगजाहीर बाजार मांडलाय !  कोणी १० टक्के दतो का ? कोणी १३ टक्के देतो का ? तुला काम देतो असे सांगितले जात आहे. नीलेश लंके दोन वर्षे झालीत आमदार झालाय. असं कधी कानावर आलयं का कोणत्या अधिकाऱ्याला दोन रूपये मागितले म्हणून ? समाजासाठी काम करणारी आत्मीयता लक्षात येते. तालुक्यात सध्या हे भुछत्र उगवले आहेत ते दोन, चार  महिन्यांमध्ये आपण भुईसपाट करणार आहोत". असे आव्हान आ. लंके यांनी यावेळी बोलताना दिले. 

 यावेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, संचालक अशोक कटारिया, अ‍ॅड. राहूल झावरे, बापूसाहेब शिर्के,संजिव भोर, शिवाजी व्यवहारे, बाळासाहेब खिलारी, अरूण आंधळे, व्हि. एस. उंडे, अंकुश पायमोडे, शिशिकांत आंधळे, संदीप चौधरी, डॉ.बाळासाहेब कावरे, श्रीकांत चौरे, गुलाबराव पाटील, अशोक पवार, रामदास दाते, सोमनाथ आहेर, लहू धुळे, झुंबराबाई आंधळे, वर्षा मुळे, जगदाळे सर, जनाबाई आंधळे, प्रकाश गाजरे, पांडूरंग जाधव, उमाताई बोरूडे, मयुरी औटी, दिपाली औटी, सुनिता आहेर,पियुष गाजरे, पोपट गुंड, अजित भाईक, बाळासाहेब शिंदे, सुभाष शिंदे, गुलाब राजे भोसले, नितिन दावभट आदी  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या