Ticker

6/Breaking/ticker-posts

संजय राऊत हे महाराष्ट्र सरकारवर खटला भरणार का?; चित्रा वाघ यांचा सवाल

 *भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.

*ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू नाही असे सांगून केंद्र सरकार खोटे बोलत आहे , असे राऊत यांनी म्हटले होते.








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू झाला नसल्याचे केंद्र सरकारने सांगितल्यानंतर देशभरातून विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर शिवसेनेचे संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकार हे सत्यापासून दूर पळत असून ते भ्रमिष्ट झाले आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ.यांनी जोरदार प्रत्युत्तर देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

चित्रा वाघ यांनी आपला एक व्हिडिओ ट्विट करत हे प्रश्न उपस्थित केले आहेत. वाघ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'संजय राऊत यांना शब्द सूचत नाहीत, असं कानावर आलं आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. 

मग आम्हालाही काही प्रश्न पडलेत, की मे महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही, असे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दिलेलं आहे. आणि त्यामुळे आता संजय राऊत हे महाराष्ट्र सरकारवर खटला भरणार आहेत का? आतापर्यंत केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारने ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले, याची माहिती दिली आहे का? किंवा ते आता देणार आहेत का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुकीची माहिती जर संपादकांना कुणी देत असेल, तर याची जबाबदारी कोणावर निश्चित करणार?'

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या