*केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या
महागाई भत्त्यात ११ टक्क्यांची वाढ
* पेन्शनधारकांनाही होणार फायदा
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
गेल्या वर्षी करोना संक्रमणाच्या
सुरुवातील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्याचा निर्णय घेण्यात आला
होता. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानं कर्मचाऱ्यांना दिला
जाणाऱ्या महागाई भत्त्याचे दोन हप्ते रोखण्याचा निर्णय घेतला होता. महागाई भत्याचा
हप्ता प्रत्येक सहा महिन्यांनी जारी केला जातो. वर्षात पहिल्यांदा १ जानेवारी आणि
दुसरा १ जुलै रोजी महागाई भत्ता जारी केला जातो.
आज
घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, १
जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ पासून लागू
होणाऱ्या तीन हप्त्यांवरील स्थगिती मागे घेण्यात आलीय. यानंतर तीन हफ्ते मिळून
एकूण ११ टक्के वाढ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. म्हणजेच महागाई भत्त्याचा सद्य दर १७
टक्क्यांहून वाढून २८ टक्क्यांवर करण्यात आलाय. सरकारच्या या निर्णयाचा फायदा
केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसंच पेन्शनधारकांनाही होणार आहे.
वाढत्या महागाईमुळे वस्तुंच्या किंमती
वाढतात. त्यामुळे लोकांच्या हातात असलेला पैशाचं मूल्यंही कमी होतं. याचा सामना
करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांची
वाढत्या महागाईचा सामना करून आपल्या गरजेच्या वस्तू किंमती वाढल्यानंतरही खरेदी
करण्याची क्षमता वाढते.
0 टिप्पण्या