Ticker

6/Breaking/ticker-posts

ना. थोरातांनी उभे केलेले सहकाराचे मॉडेल सर्व राज्यांयांसाठी उपयुक्त - छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल

 2023 पर्यंत निळवंडे चे कालवे पूर्ण करून पाणी देणार - ना. पाटील


संगमनेर:- केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याने शेतीमालाचे भाव वाढून शेतकर्‍यांना फायदा न होता भांडवलदार व व्यापारी यांना  झाला. कृषीप्रधान भारतात केंद्र सरकार शेतकर्‍यांचे हाल करत असून हे दुर्देवी आहे. महाराष्ट्रात सहकारात चळवळीतून ग्रामीण विकास झाला असून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी उभे केलेले सहकाराचे मॉडेल हे छत्तीसगड सह देशातील सर्व राज्यांयांसाठी उपयुक्त ठरेल असे गौरवोद्गार छत्तीसगडचे मुख्यमंत्री नामदार भूपेश बघेल यांनी काढले आहे.
            सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील हे होते तर व्यासपीठावर राज्यांचे महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, आ.डॉ. किरण लहामटे, माजी आमदार नरेंद्र घुले, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे , रणजितसिंह देशमुख , बाजीराव पा.खेमनर, सौ. दुर्गाताई तांबे, राजेश मालपाणी, सचिन गुजर, करण ससाणे, डॉ. राजीव शिंदे, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, लक्ष्मणराव कुटे, विजय अण्णा बोराडे , उत्कर्षाताई रूपवते , प्राचार्य केशवराव जाधव, प्रा. बाबा खरात, राजेश मालपाणी, इंद्रजितभाऊ थोरात, सेवा दलाचे विलास औताडे आदी उपस्थित होते.
            याप्रसंगी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने येष्ठ संपादक संजय आवटे यांना तर हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.आण्णासाहेब शिंदे पुरस्काराने ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित डिसले यांना आणि सहकारातील कार्यकर्ता या पुरस्काराने अ‍ॅड माधवराव कानवडे यांना गौरवण्यात आले. 1 लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
याप्रसंगी बोलताना ना. बघेल म्हणाले की, महाराष्ट्र ही स्वतंत्रता आंदोलनाची भूमी असून देशाला विचार दिले आहेत. सहकार चळवळ ही येथील विकासाचा गाभा आहे. संगमनेरचा सहकार हा मॉडेल व सर्वांसाठी उपयुक्त आहे . हा प्रयोग छत्तीसगडमध्ये आपण राबवणार असून देशाला ही मार्गदर्शक ठरणार आहे. देशात सध्या शेतकरी व कामगार विरोधी धोरण राबवले जात असून दिल्लीच्या वेशीवर चाळीस दिवस शेतकरी आंदोलन करतात मात्र केंद्र सरकार त्यांच्याकडे परस्पर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे . खरे तर केंद्र सरकारने छत्तीसगड सरकारचे मॉडेल राबवले पाहिजे. खासदार राहुल गांधी यांनी दिलेली न्याय योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली गेल्याने या राज्यांत विकासाला गती मिळाली असल्याचेही ते म्हटले असून राज्यांत ना। बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष दमदार वाटचाल करत असून आगामी काळात संगमनेर व परिसरासाठी वैभवाचे दिवस राहणार असल्याचे ते म्हणाले।
            जयंत पाटील म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा समृद्ध वारसा ना। बाळासाहेब थोरात हे सांभाळत आहेत. मला कधीही थोरात यांचा फोन आला की पहिले निळवंडेचे काम आहे, असेच वाटते भाऊसाहेब थोरात,ना.बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालव्यांसाठी ध्यास घेतला असून येत्या 2023 - 24 पर्यंत कालव्यांची कामे पूर्ण करून पाणी देणारच आहोत. पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी करणे हेच महाविकास आघाडी सरकारचे मुख्य उद्देश असून यासाठी वळण बंधार्‍यांना ही स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. त्या कामांना गती दिली आहे. थोरात सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचा विकास झाला असून सहकार बरोबर शैक्षणिक व प्रगतीमध्ये हा संगमनेर तालुका अग्रेसर ठरला आहे. राज्यांतही नामदार बाळासाहेब थोरात यांची  अत्यंत महत्त्वाची भूमिका असून त्यांच्या सहकार्यामुळेच महाविकास आघाडी सरकार आले आहे. शेततळ्यातून झालेली जलक्रांती किंवा कोणत्याही योजना कशा प्रभावीपणे राबवून हे ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडून शिकावे असेही ते म्हणाले.
            महसूल मंत्री ना. थोरात म्हणाले की, ना. बघेल यांनी भाजपला धडा शिकवत मोठा दैदिप्यमान विजय मिळवून छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर आणले. त्याच्या पाठोपाठ महाराष्ट्रात राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. यामध्ये जयंत पाटील यांचाही मोठा वाटा राहिला खरे तर महाराष्ट्रात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, डॉ. अण्णासाहेब शिंदे ,तीर्थरुप भाऊसाहेब थोरात यांनी घेतलेल्या पायामुळे व केलेल्या कामामुळे आज आपण आनंदी जीवन जगत आहोत. हाच वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे अडचणीच्या काळात संजय आवटे आणि पुरोगामी विचार कायम जोपासला असून रणजितसिंह डिसले यांनी प्राथमिक शिक्षकांना ग्लोबल चेहरा मिळवून दिला आहे. तर माधवराव कानवडे यांच्या काळात सहकारातील महत्त्वाचे कार्यकर्ते असून त्यांच्या कार्यकाळात झालेल्या नवा कारखाना निर्मितीचा निर्णय अत्यंत ऐतिहासिक ठरला आहे. देशात शेतकर्‍यांचे राज्य पाहिजे मात्र भाजप हे शेतकर्‍यांना वेठीस धरून भांडवलदारांचा साठी कायदे करून पाहतय असा आरोप त्यांनी केला.

    
  यावेळी शंकरराव पा.खेमनर, दिलीपराव शिंदे, अमित पंडीत, रामदास पा.वाघ, सौ.मिराताई शेटे, सा.सुनंदाताई जोर्वेकर, नवनाथ अरगडे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, विश्‍वासराव मुर्तडक, जगन्नाथ घुगरकर, भास्कर पानसरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी आभार मानले. यावेळी राज्य,जिल्हा व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या