Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यातील ग्रामसभा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय



मुंबई : -   ग्रामीण भागााातील कोरोोनाची स्थिती नुकत्याच झालेेल्या निवडणूका आणि प्रभारी प्रशासकीय बाबोंच्या पार्श भूमीवर राज्याातील ग्राामसभा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
काल मुंबई येथे ग्रामसेवक संघटनेच्या नेत्यांनी ग्रामविकास मंत्री  ना. हसन मुश्रीफ  यांची भेट घेऊन याबाबत मागणी केली होती . त्यावर ना . मुश्रीफ यांनी ही घोषणा केली .
ग्रामीण भागात अद्यापही कोविडची परिस्थिती पूर्वपदावर नाही . तसेच राज्यातील सुमारे १४५०० ग्रामपंचायतींवर प्रशासक राज असून एका - एका ग्रामसेवकाकडे एकापेक्षा  जास्त ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे . त्यामुळे एकाच वेळी या सर्व ग्रामपंचायतीच्या सभांना उपस्थित राहणे शक्य नाही . याशिवाय ज्या ग्रामपंचायतींच्या नुकत्याच निवडणूका झाल्या आहेत . तेथे अद्याप सरपंच व अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणे बाकी आलेत अशा स्थितीत  ग्रामसभा केवळ औपचारिकता ठरेल . आदि बाबी राज्य ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या .  व ग्रामसभांना मुदतवाढ देण्याची विनंती केली .त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून यावर ना . मुश्रीफ यांनी तात्काळ  ग्रामसभा 31 मार्च पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय आज जाहीर केला . त्यामुळे ग्रामसेवकांना दिलासा मिळाला आहे .
 आज सकाळपासून राज्याध्यक्ष एकनाथराव  ढाकणे ,राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे व  राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम या मुंबईत ठाण मांडून होते. 
   या निर्णयावर राज्याध्यक्ष् ढाकणे म्हणाले की , औरंगाबाद येथे माननीय राज्य मंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांनी सुद्धा याबाबत अनुकूलता दर्शविली होती आज दिवसभर पाठपुरावा झाल्यामुळे  या प्रयत्नाला यश आलेले आहे . मंत्री मनोदयांसह सर्वांचे आभार .. !




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या