Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरच्या राजकारणात शेवटपर्यंत काहीही घडू शकतं; खा. विखें पाटलांच्या गुगलीने नवा ट्विस्ट..

* महापौरपद निवडणूक अवघ्या २ दिवसांवर ; खा. विखेंच्या वक्तव्याने राष्ट्रवादी –सेनेत चलबिचल..

 *वरिष्ठांनी निर्णय घेतला तर विकासाच्या मुद्द्यावर कोणासोबतही जाऊ शकतो.

 


लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 अहमदनगर : नगरच्या महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना तुर्त एकत्र   आले असुन शिवसेनेचा महापौर तर राष्ट्रवादीचा उपमहापौर असं वरिष्ठांसमोर ठलल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमच्याकडे महापौरपदासाठी उमेदवार नसला तरी वरिष्ठांनी निर्णय घेतला तर आम्ही विकासाच्या मुद्द्यावर कोणासोबतही जाऊ शकतो असे  सूचक वक्तव्य केले . अहमदनगरच्या राजकारणात शेवटपर्यंत काहाही घडू शकतं, अशी गुगली टाकून नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे.

 

महापौरपदासाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने भाजप या निवडणुकीतून बाहेर पडल्याने शिवसेना व राष्ट्रवादीला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. तर दुसरीकडे शिवसेना व भाजप पुन्हा एकत्र येण्याचा पर्यायही खुला झाला आहे. अशाही परिस्थितीत भाजपच किंगमेकर ठरेल, असे वरिष्ठ नेते सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर विखे यांनी केलेले वक्तव्य सूचक ठरले आहे.

 

सध्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर आहेत. त्यांची मुदत ३० जूनला संपत आहे. त्याच दिवशी महापौरपदाची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी रविवारी विखे यांच्या उपस्थिती महापौरपदाच्या काळात शहरात केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर डॉ. विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


यावेळी विखे पा.म्हणाले, ‘ महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी यावेळी राखीव आहे. या प्रवर्गातील उमेदवार भाजपकडे नाही. त्यामुळे या पदावर आमचा दावा असू शकत नाही. आमच्याकडे उमेदवार नसल्याने आम्ही विरोधी पक्षात राहणार आहोत, ही आजची परिस्थिती आहे. मात्र, नगरचा इतिहास पाहता, निवडणूक होईपर्यंत पुढचे आत्ताच काही सांगता येत नाही.'

 

या परिस्थित कोणासोबत जायचे, याचा वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊ शकतो. त्याची आम्ही स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करू. शिवसेनेचे नगरसेवक मुंबईत आपल्याला भेटले होते, ही वस्तुस्थिती आहे, मात्र ते त्यांच्या कामासाठी आले होते व मी माझ्या कामाला गेलो होतो. अहमदनगरला एकदा आमची भेट झाली होती. त्यावेळेला आमच्याशी महापौर पदाबाबत त्यांनी चर्चाही केली होती. मात्र, राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे तुम्ही तुमच्या पक्षाचा निर्णय झाल्यानंतर त्यावर बोलणे उचित होईल, असे मी त्यांना सांगितले होते. असेही विखे म्हणाले.


 नगरमध्ये काम करताना सर्वच पक्षांचे सहकार्य लाभल्याचे विखे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘खासदार म्हणून मी नवीन होतो. मात्रयेथील नागरिकांना मला लवकर स्वीकारले. काम करण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळाले. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व मी लोकसभेची निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढविली. मात्रपुढे आमदार झाल्यावर शहराच्या कामासंबंधी आमच्यात उत्तम संवाद राहिला. सर्वच पक्षांनी मिळून काम केले तर नगरच् विकासासाठी कोणाकडे हात पसरण्याची वेळ येणार नाहीअसा आशावाद त्यानी व्यक्त केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या