लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई : राज्यात लसीकरण मोहीम
प्रभावीपणे राबवण्यासाठी केरळ पॅटर्नचा अवलंब करा, अशी मागणी माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक सावंत यांनी
केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही
पाठवले आहे.
त्यासाठी
लसीकरण केंद्रांवर योग्य नियोजन करण्यात आले. लशीच्या एका कुपीतून १० लोकांना लस
देता येते. त्यामुळे तेवढे लोक असल्याशिवाय संबंधित केंद्रावर लसीकरणाला सुरुवात
केली जात नसे. त्यासाठी ऑटो डिसपोझेबल सिरिंज वापरण्यात आल्याचे सावंत यांनी
म्हटले आहे. असाच प्रोटोकॉल राज्य सरकारने आपल्याकडे तयार करून त्याची कठोर
अंमलबजावणी करावी. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात लसीकरण पुरवठ्याबाबत
होणाऱ्या वादावर तोडगा निघू शकतो, असा विश्वास दीपक सावंत यांनी व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या