Ticker

6/Breaking/ticker-posts

जळगावच्या महिला वसतीगृहातील घटनेच्या चौकशीचे गृहमंत्र्यांचेआदेश

 चार महिला अधिकाऱ्यांची समिती, गृहमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

 

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

 

मुंबई :  जळगावातील महिला वसतीगृहातील तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेने महाराष्ट्र हादरुन गेला होता. सदर घटनेची गंभीर दखल महारष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. जळगावच्या महिला वसतीगृहातील घटनेच्या चौकशीसाठी चार महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

काय आहे प्रकरण :

जळगावातील महिला वसतीगृहातील  तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

 

अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई

जळगावच्या घटनेच्या चौकशीसाठी तेथील स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाईल. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले. जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे, असं म्हणत घडलेली घटना गंभीर आहे. याची सविस्तर चौकशीती मागणी विधानपरिषद सदस्य मनीषा कायंदे आणि प्रसाद लाड यांनी केली.या मुद्यावर उत्तर देताना गृहमंत्र्यांनी चार महिला अधिकाऱ्यांची समितीची घोषणा केली.

वसतिगृहातील गैरप्रकाराच्या तक्रारी

महिला आणि बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार आणि अन्याय, अत्याचार झालेल्या महिला आणि मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या.

जननायक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे यांनी वसतिगृह गाठून महिला आणि मुलींना भेटून माहिती जाणून घेतली असता एक मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरील पुरुषांनी मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार समोर आला.

चौकशीच्या नावाखाली पोलिसांकडून अनैतिक कृत्य?

काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बाहेरील लोकांना आणि पोलिसांना चौकशीच्या नावाखाली आतमध्ये प्रवेश देऊन अनैतिक कृत्य केले जात असल्याची कैफियत काही मुलींनी मांडली. ज्या मुली चुकीच्या कृत्यांना नकार देतात, त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली जाते. सामाजिक कार्यकर्त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता, मुली बाहेरुनच खिडकीतून आपल्यावर बेतलेले प्रसंग ओरडून सांगत होत्या. या मुली बोलण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनाही संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून मज्जाव केला जात होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या