Ticker

6/Breaking/ticker-posts

कुणाचंही मन दुखवुन मी स्वतःचं स्थान निर्माण केलं नाही

 

बीड : कौटुंबिक कलह आणि तक्रारींमुळे मागच्या काही दिवसांपासून वादात सापडलेले राज्याचे सामाजिक व न्याय न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच काल  छोटेखानी कार्यक्रममध्ये आपलं मन मोकळं केलं . शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोह इथल्या ग्रामसचिवालयाचे उद्घाटन धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

            बलात्काराचे आरोप ,त्यानंतर झालेला राजकीय गदारोळ  शांत झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. अशा कठीण प्रसंगातसुद्धा तुम्ही तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे केले आहे. तुम्ही मला या कठीण काळात साथ दिली तुमचे उपकार मी शब्दात फेडू शकत नाही, हे सांगतानाच आपल्या उपकाराची परतफेड माझ्या कातड्याचे जोडे करून तुम्हाला घातले तरी ती पूर्ण होणार नाही, असे म्हणून उपस्थित समर्थकांचे धनंजय मुंडे यांनी आभार मानले. मी आतापर्यंत अनेक संकटाला सामोरे गेलो पण जीवनामध्ये कधीच कुणाचंही मन दुखवुन मी स्वतःचं स्थान निर्माण केलं नाही असं विधान  मुंडे यांनी यावेळी केलं.

            बऱ्याच दिवसानंतर मी आज माईक हातात घेतला आहे, मला बरंच बोलायचं आहे. पण, पुढे कार्यक्रम असल्यामुळे बोलता येत नाही असं सांगतानाच अनेक विषय दाटून आलेत. मात्र, आता फार काही बोलणार नाही, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी वादानंतर पहिल्यांदाच मौन सोडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या