Ticker

6/Breaking/ticker-posts

शर्मिला गोसावी यांना अभिनव खान्देश प्रेरणादायी महिला पुरस्कार प्रदान

शर्मिला गोसावी यांना अभिनव खान्देश प्रेरणादायी महिला पुरस्कार प्रदान
 

















लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


अहमदनगर :“सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी बरोबरच साहित्यिक कार्यात शब्दगंधचे योगदान मोठे असुन चळवळीच्या संस्थापक सदस्या म्हणुन शर्मिला गोसावी यांचे कार्य विस्तारत जाणारे आहे,त्यामुळेच त्यांचा गौरव करतांना आनंद होत आहे," असे मत अभिनव खान्देश परिवाराचे प्रमुख प्रभाकर सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.

            धुळे येथील कै.सौ.नलिनी सुर्यवंशी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सामाजिक,साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शर्मिला गोसावी यांना तपोवनरोड वरील निवासस्थानी पुरस्कार प्रदान करतांना  सुर्यवंशी बोलत होते.यावेळी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे,उपाध्यक्ष सुभाष सोनवणे,खजिनदार भगवान राऊत इ मान्यवर उपस्थित होते.

        कोरोना संसर्गाच्या  पाश्वभूमीवर एकत्रित कार्यक्रम न घेता ज्यांना पुरस्कार जाहिर करण्यात आला त्या डॉ.गुंफा कोकाटे,श्रीरामपूर,स्वाती राजेभोसले,पुणे,रिताताई जाधव,मुंबई,सरोज आल्हाट,नाशिक,वृंदा कुलकर्णी,कोल्हापूर, सविता दरेकर,नाशिक, सुनीता बहिरट,आळे, ज्योत्स्ना डासाळकर, कोल्हापूर या सर्वांना घरपोच  अभिनव खान्देश प्रेरणादायी महिला पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात आले.

पुढे बोलताना प्रभाकर सुर्यवंशी म्हणाले कि, अहमदनगर मधील साहित्यिक वातावरण सुसंस्कृत ठेवण्यामध्ये  प्रा.शर्मिला गोसावी यांचा महत्वाचा वाटा आहे,त्या श्री.साई इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असून शब्दगंध साहित्यिक परिषदच्या संस्थापक सदस्य आहेत.त्यांची बांगड्यांची खैरात, नजराणा,मनमीत पुस्तके प्रकाशित असून वन्स मोअर मराठी कविता व मनातला पाऊस चे त्यांनी संपादन केलेले आहे.चौदा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन केलेले असून आकाशवाणी अहमदनगर,पुणे वर ११ वेळा कविता वाचन केले आहे.उत्कृष्ट निवेदिका म्हणून २८९ कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केलेले असून त्या शब्दगंध प्रकाशन,च्या संचालिका त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार निवड समितीने त्यांची निवड केली होती,येथे आल्यानंतर त्यांचे कार्य पाहुन समाधान वाटले.

          यावेळी राजेंद्र उदागे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तर प्रा. डॉ.अशोक कानडे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र,रु.२००० ची पुस्तकं शर्मिला गोसावी व सुनील गोसावी यांनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली.

       यावेळी शर्मिला गोसावी म्हणाल्या कि, 'अभिनव खान्देश परिवार हे साहित्यातील एक कुटुंब असुन या  कुटुंबातील खानदेश मधील जेष्ठ सदस्यांनी दिलेली ही शाब्बासकीची थाप आहे,या पुरस्काराचा नम्रपणे मी  स्विकार करून तमाम महिला भगिनींना लेखनरुपाणे व्यक्त होण्याचे मी आवाहन  करते.महिलांचे प्रश्न,समस्या, भाव भावनांचे हिंदोळे नव्या साहित्यातून यायला हवे,यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया ' अचानक झालेल्या या घरपोच पुरस्कार वितरण समारंभास प्रा.बबनराव गिरी,मारुती सावंत,मकरंद घोडके आदि मान्यवर उपस्थित होते.सुनील गोसावी यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या