Ticker

6/Breaking/ticker-posts

ओबीसींना केंद्र सरकारने तातडीने आरक्षण द्यावे

 समता परिषदेच्यावतीने रस्ता रोको आंदोलन 



  






लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

अहमदनगर :नुकतेच सुप्रिम कोर्टाने .बी.सीआरक्षणाला स्थगिती दिलेली आहेहा ओबीसी   घटकांवर झालेला फार मोठा अन्याय झाला आहेतेव्हा हे आरक्षण पूर्ववत मिळावेत या मागणीसाठी   अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने जुने बस्थानक येथे निदर्शने करुन रस्ता रोको   करण्यातआले .

 

 याप्रसंगी राज्य प्रदेश उपाध्यक्ष माजी .पांडूरंग अभंगप्रदेश सरचिटणीस अंबादास गारुडकर,   विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगडमहानगर अध्यक्ष दत्ता जाधवजिल्हाध्यक्ष सुभाष लोंढेउत्तर   जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदेराज्य प्रचारक नागेश गवळीमाजी महापौर भगवान फुलसौंदरबाळासाहेब बोराटेप्रा.माणिक विधातेअनिल बोरुडेबाळासाहेब भुजबळसंभाजी अनारसे आदि प्रमुख उपस्थित होते.

 

यावेळी भावना व्यक्त करतांना मान्यवरांनी सांगितले की,1992 साली महात्मा फुले समता परिषदेच्या जालना येथे झालेल्या मेळाव्यात श्री.छगनराव भुजबळ यांनी मंडल आयोगाच्या शिफारस राज्यात लागू करण्याची मागणी केलीत्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मंडल आयोग महाराष्ट्रात लागू केलासामाजिक समतेच्या संघर्षात मागास असलेल्या ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण   प्राप्त झालेत्यामुळे ओबीसी वर्गातील अनेक कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करण्याची संधी मिळाली.

 

सुप्रिम कोर्टाने सुनावणीदरम्यान ओबीसी वर्गाची माहिती राज्य सरकार  केंद्र सरकारने द्यावीअसे सुचवले.. 2011साली झालेल्या जनगणनेची आकडेवारी केंद्र सरकारकडे उपलब्ध असतांनाही ती माहिती    सुप्रिम कोर्टाला  दिल्यामुळे ओबीसी आरक्षण स्थगित करण्यात आलेतर केंद्रसरकारने इंपिरियल डाटा कोर्टाला दिला असता तर ओबीसी आरक्षण टिकले असते.


या देशात शेळ्यामेंढ्या जनावरे यांची मोजणी केली जातेपरंतु ओबीसी समाजात  जनहित जनगणना राज्य सरकारकेंद्र सरकार जाणूनबुजून टाळत आहेओबीसीची जातनिहाय   संख्या निश्चित झाल्यास त्यांना आर्थिक फायदे मिळू शकतातओबीसींचे शिक्षणनोकरीयातील   आरक्षण जरी शिल्लक असले तरी राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहेम्हणून राज्य शासनाने    त्वरित राज्य मागास आयोगामार्फत जनगणना करुन केेंद्रामार्फत आरक्षण पूर्ववत करावे  मंडल आयोगाच्या उर्वरित शिफारस राज्याला लागू करुन विधान मंडळ लोकसभा हयात ओबीसी आरक्षण लागू   करावेअशी मागणी केली.

 

या आंदोलनात सचिन गुलदगडविष्णूपंत म्हस्के,  बजरंग भुतारेअशोक तुपेदिपक खेडकरभरत गारुडकरअनिल इवळेबबनराव घुमटकरप्रा.संजय गारुडकरवसंत रांधवणेअशोक कानडेनानासाहेब गाडेकरडॉ.सुदर्शन गोरेबाळासाहेब गिरमेपरेश लोखंडेसुषमा पडोळेमंगल भुजबळ आदिंसह विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

प्रारंभी बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहारअर्पण  करुन  आंदोलनास सुरुवात करण्यात आलीयावेळी जागो ओबीसी जागो.... ओबीसी का नारा है.. आरक्षण हमारा है... ओबसींची जनगणना झालीच पाहिजे अशा घोषणाहलगीतुतारीने परिसर दणानूण गेला होतात्यामुळे रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली होतीयानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या