Ticker

6/Breaking/ticker-posts

पुरेसा पाऊस होईपर्यंत शेतक ऱ्यांनी पेरणीची घाई करू नये - शिंदे

  कृषी अधिकारी सुधीर शिंदेंची  पेरणीच्या चाड्यावर मुठ








लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

साकत : शेतकरी बांधवांनी पेरणी योग्य पाऊस होईपर्यत पेरण्याची घाई - गडबड करू नये असे आवाहन कृषि अधिकारी सुधीर शिंदे यांनी,केले आहे . दरम्यान शेतकऱ्याना बि- बियाणे , खते मिळाले का ? याची थेट बांधावर जाऊन चौकशी करणारे तालुका कॄषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी चक्क चाड्य्यावर  मुठ धरून पेरणी प्रात्यक्षिक करून दाखवल्याने साकत परिसर तील शेतकऱ्यांमध्ये हाच चर्चाचा विषय बनला आहे .

    

यावेळी शिंदे यांनी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे अभिजित गदादे,  मंडल कृषी अधिकारी के.एम.हिरडे ,  कृषी पर्वेक्षक ए. यु. कदम , सुरेश वराट , कृषी सहाय्यक  प्रशांत जाधव , तंत्रज्ञान व्यवस्थापक  तुषार गोलेकर , गणेश वारे , कृषी विभागाची संपूर्ण टीम घेऊन साकत परिसरातील दिव्यांग , महीला दुर्बल घटकातील शेतक -यांच्या शेतात जाऊन भेटी घेऊन त्यांची विचार पुस करून अडी- अडचणी समजुन घेतल्या .


 शिंदे म्हणाले की . शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे विकत घेण्यापेक्षा आपले घरातील दुरीचे बियाणे वापरावे , बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी त्यामुळे अनेक रोगापासून बचाव होतो व उगवणक्षमता वाढते यावेळी  बीज प्रक्रिया व पिकाची उगवण क्षमता प्रात्यक्षीक करून दाखवले  बि- बियाणे मिळाले का काही अडचण आली तर मला फोन करा शासनाने मला आपली मदत करण्यासाठी धाडले आहे .शेती सुधारीत पध्दतीने करण्याचे अव्हान केले. अविनाश लहाने , जगन्नाथ मुरूमकर ' प्रविण वराट ' महादेव वराट , युवराज वराट खंडु घोलप , राम  गायकवाड , मुकेश वराट ,  बाळासाहेब वराट , ताई लहाने , चंद्रकला गायकवाड , अश्वीनी वराट  आदी शेतकऱ्यांच्या शेतात भेटी दिल्या

साकत गाव मराठवाड्याचे प्रवेश द्वार असल्याने शेजारी  शेतकरी कृषी विभागाचे कौतुक करत म्हणत होते तुम्ही नशीबवान आहात  , गड्यानो अखंड मानवजातील शरीराचे कार्य पुर्ण क्षमतेने चालविण्यासाठी आवश्यक असलेले अन्न पुरविणाऱ्या शेतकरी हा अनादी काळापासुनच कशाचीही पर्वा न करता शेती कसत आला आहे . काळ्या आईची ओटी भरायची ही शेतकऱ्यांची परंपरा आहे . त्यामुळे कोरोना सारखे आजार येतात आणि जातात मात्र शेतकरी कष्ट करावयाचे थांबत नाही . मग आम्ही थांबवुन कसे  चालनार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हे तर आमचे  कर्तव्य आहे. असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले .

"जामखेड कृषी विभागाकडून आम्हाला नेहमी सहकार्य मिळते आम्ही फोन केला की आम्हाला थेट बांधावर येऊन कोणती फवारणी करावी यांची माहीती आधिकारी देतात" 

-बाळासाहेब वराट (दिव्यांग शेतकरी )

"आमच्या शेतात येऊन पेरणी करुन मार्गदर्श करणे व अडी- अडचणी समजुन घेऊन प्रत्यक्ष करून दाखवल्याने आम्हाला आमचा शेतकरी पोरगा आधिकारी मिळाला असे वाटते ."

-चंद्रकला गायकवाड (माहिला शेतकरी )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या