Ticker

6/Breaking/ticker-posts

आमदार मोनिकाताईं राजळेनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी : अधिकार्यांना दिल्या सूचना



 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पाथर्डी :-पाथर्डी तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील अठरा ते वीस गावात अवकाळी पाऊस ,वादळी वारा आणि गारपिटीने शेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच प्रमाणे राहत्या घरांची पडझडीसह जनावरांचे गोठ्याचे व घरांचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेली आहेत. त्यामुळे याभागाचा पाहणी दौरा आज आमदार मोनिकाताई  राजळे यांनी प्रांताधिकारी देवदत्त केकाण ,तहसीलदार शाम वाडकर,कृषी अधिकारी प्रवीण भोर यांच्या समवेत पाहणी दौरा करून नुकसानी बाबत प्रशासनाला सूचना केल्या.

दौऱ्या दरम्यान जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे,पंचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड,सदस्य विष्णुपंत अकोलकर,जमीर आतार,राजेंद्र दराडेबंडु नागरेउद्धव घनवटअबुभाई पटेल,आप्पासाहेब सातपुतेसाहेबराव सातपुतेनितीन सातपुते उपस्थीत होते.

आमदार मोनिका राजळे यांनी आज सकाळी नुकसानग्रस्त भागाचा डांगेवाडी पासून पाहणी दौरा सुरु केला.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेत बांधावर जाऊन शेती पिकांची नुकसानीची पाहणी केली. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे तालुक्यातील पंधरा ते विस गावातील शेकडो एकर क्षेत्रावरील पिकांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे.चितळीपाडळीसाकेगाव,काळेगावसुसरेपागोरीपिंपळगावसोमठाणेसांगवीप्रभुपिपंरी,माळेगावनिपाणी जळगावकोरडगावकळसपिंप्रीढवळेवाडी या गावला भेट देवुन पाहणी केली. 

साकेगाव येथे केळी पिकटरबुजकांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुसरे येथे चिचं व कांदा पिकांला जबर फटका बसला आहे. पागोरी पिपंळगावमधेही कांदागहुहरभरालिबोंणीसंत्रामोसंबी व डाळींब पिकाचे नुकसान झाले आहे. आंब्याच्या बागेत कै-याचा खच पडला आहे.मोहरही गळुन गेला आहे. शेतक-यांच्या हातातोंडाशी  आलेला घास गारपीटीमुळे हिरावला गेला आहे. पिकासाठी झालेल्या लाखो रुपयाचा खर्च वाया गेला आहे. शेतकरी कर्जबाजारी होणार आहे. जोरदार वाऱ्यांच्या झोक्याने अनेक ठिकणाच्या घरांची पडझड होऊन पत्रे उडून गेली मात्र यात कोणाला इजा झाली नाही. 

 यावेळी बोलतांना आमदार राजळे म्हणाल्या ,शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळणेसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे.शेतकऱ्यांच्या शेती पिकांसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसानी झाल्या आहेत.योग्यरीत्या पंचनामे होऊन त्याला तुटपुंजी मदत सरकारने देऊ नये,भरीव मदत द्यावी. शेतीच्या पिकाबरोबर होणार खर्चाचे पैसे मिळून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी. मागील अवकाळी आणि अतिवृष्टीचे नुकसानाचे अनुदान प्राप्त झाले नाही.वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे तोडलेली वीज कनेक्शन पैसे भरून सुद्धा चालू केले नाही असे कनेक्शन त्वरित सुरु करावे.प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत,शासनाला नुकसानीची परिस्थती कळून तातडीने मदत मिळून दिली पाहिजे.असे न झाल्यास शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा राजळे यांनी दिला आहे. 


महीलेला  तात्काळ मदत

काळेगाव येथील चंदा मोहन सातपुते या महीलेचे घर वादळात पडल्याने तिचा संसार उघड्यावर आला. घडलेली परस्थीती सांगताना सातपुते यांना आश्रु अनावर झाले.आमदार राजळेही भावुक झाल्या. या कुटुंबाला पाथर्डी येथील सुवर्णयुग मंडळाकडून राजळे यांच्या हस्ते रोख पाच हजारांची मदत तात्काळ घराचे पत्रे घेण्यासाठी दिली . 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या