Ticker

6/Breaking/ticker-posts

पतंजलीच्या ‘करोना’औषधाचा दावा खोटा

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

मुंबई:-योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने तयार केलेल्या करोना प्रतिबंधक औषधाला 'इंडियन मेडिकल असोसिएशन' या डॉक्टरांच्या अधिकृत संघटनेने विरोध केला होता. या औषधाला डीसीजीआयची संमती मिळाल्याचा दावा पतंजलीने केला होता, मात्र माहिती अधिकारात 'आयएमए'नेही या संदर्भातील सत्यता पडताळून पाहिल्यानंतर, डीसीजीआयने रामदेव यांच्या औषधांना कोणतेही प्रमाणपत्र वा मान्यता दिली नाही, असे स्पष्टीकरण माहिती अधिकारान्वये विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दिले आहे.

हा प्रकार पूर्णपणे सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा व त्यांच्या आरोग्याशी खेळ करणारा आहे. जिथे लस येण्यासाठी इतक्या महिन्यांचा कालावधी लागला, तिथे हे औषध कसे उपलब्ध झाले, हा प्रश्नही 'आयएमए'ने उपस्थित केला होता. महिनाभरापूर्वी जेव्हा या औषधाबद्दल विविध माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येत होती, तेव्हाही या औषधाला अशी कुठल्याही प्रकारची मान्यता दिली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने ट‌्वीट केले होते.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये हे औषध सादर करण्यात आले. सुरुवातीला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे औषध असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, नंतर ते करोनावर मात करणारे औषध असल्याचे सांगितले जात होते. या उद्घाटनाच्या कार्यक्रमात जे वैज्ञानिक लेखन सादर करण्यात आले, त्याला कोणता आधार होता, असाही प्रश्न उपस्थित करून 'आयएमए'ने राष्ट्रीय आरोग्य संघटनेवर कडाडून टीकाही केली आहे.

लाभार्थींनी लस घ्यावी
लसीकरणासंदर्भातील कोणतेही गैरसमज मनामध्ये न ठेवता लस घ्यावी, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशने केले आहे. लसीकरणामुळे कोणत्याही प्रकारच्या तीव्र स्वरूपाच्या दुष्परिणामांची नोंद झालेली नाही. तसेच संसर्गाच्या वाढत्या टप्प्यामध्ये लसीकरण उपयुक्त ठरणार आहे, त्यामुळे लसीकरण टाळू नये, वैद्यकीय चाचण्या, तपासण्या, ट्रेसिंग यासाठी सर्वसामान्यांनी पुढे यावे, असेही आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या