Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँक निवडणूक : ‘ मंत्री बाळासाहेब थोरातांचे बँकेकडे लक्ष नाही ’

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क

 लोकनेता न्यूज                   

 अहमदनगर :- जिल्हा बँक ही काही राजकीय धुडगूस घालण्याची संस्था नव्हे,  मंत्री बाळासाहेब थोरात हे मोठे नेते आहेत, मात्र त्यांचे जिल्हा बँकेकडे लक्ष नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने मातृसंस्था व कामधेनू  असलेली जिल्हा बँक बुडाली तर जिल्ह्यातील साखर कारखाने, सेवा सोसायट्या तसेच हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच उघड्यावर पडतील. त्यामुळे त्यांनी यात लक्ष घालावे. असा  सल्ला बँकेचे माजी अध्यक्ष ,ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दिला आहे. . 

  जिल्हा बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच ना. थोरात यांनी  पक्षीय राजकारण  विरहीत बँक सांभाळणारे सक्षम उमेदवार द्यावेत व बँक सांभाळणारा सक्षम अध्यक्ष द्यावा तरच बँकेचे भवितव्य ठीक राहील अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते गडाख यांनी व्यक्त केली. 

  जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची  कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेची निवडणूक सुरू झाली आहे.  जिल्हा बँक ही काही राजकीय पक्षांनी धुडगूस घालण्याची संस्था नाही असे स्पष्ट करून            गडाख म्हणाले, " ही जिल्हा बँक आत्तापर्येंत महाराष्ट्रामध्ये प्रगतीपथावर ठेवण्याचा प्रयत्न स्वर्गीय  मोतिभाऊ फिरोदिया, भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले पाटील या दिवंगत नेत्यांसह आमच्या पिढीने केला आहे.  सगळ्या ग्रामीण भागाचे अर्थकारण, साखर कारखाने, सेवा सोसायट्या जिल्हा बँकेवर पूर्णत: अवलंबून आहेत.  

           गेल्या तीन वर्षांमध्ये जिल्हा बँकेवर बेकायदेशीर नोकर भरतीसह  अनेक आरोप  झाले. त्याच बरोबर जवळ जवळ  शंभर कोटी रुपये राहुरी साखर कारखान्याकडे थकलेले असून ते  वसूल होतील की नाही हे माहीत नाही.  अनुउत्पादीत कर्जाचे ( 'एनपीए) प्रमाण खूप वाढलेले आहे, ही  चिंताजनक बाब आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. अशा अवस्थेत बँकेकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी अपेक्षाही गडाख यांनी व्यक्त केली .

             

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या